शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

माणसाला माणूस बनविण्याचे काम ग्रंथ करतात - विठ्ठल वाघ

By admin | Updated: February 15, 2016 21:20 IST

अकोला जिल्हा ग्रंथोत्सवाला थाटात प्रारंभ.

अकोला : आजच्या गढूळ वातावरण मन गढूळ बनविण्याचे काम अनेक गोष्टी करीत आहेत. अशा परिस्थितीत माणसाला त्याच्या मनातील वाईट विचार धुवून काढायचे असतील तर त्याने ग्रंथाकडे वळले पाहिजे. माणसाला माणूस बनविण्याचे काम ग्रंथ करतात असे मत लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन प्रमिलाताई ओक हॉल येथे डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झाले यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर उज्वला देशमुख होत्या. यावेळी मंचावर आमदार गोवर्धन शर्मा, ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव, प्रभात किडस्चे संचालक डॉ .गजानन नारे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोपान सातभाई, रंगकर्मी अशोक ढेरे, पत्रकार डॉ. किरण वाघमारे, प्राचार्य डॉ. एस.आर. बाहेती, प्रमिलाताई ओक वाचनालयाचे सचिव मनमोहन तापडिया, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ.विठ्ठल वाघ यांनी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण ग्रंथ देत असल्याचे सांगितले. आपल्या डोळ्यात अंजन घालण्याची कुवत साहित्यात आहे असे सांगतांना विठ्ठल वाघ यांनी कवितेने डोळे दिले कवितेने दृष्टी दिली, कवितेने नवी नवी सृष्टी दिली ही कविता म्हणून दाखविली. लेखक हा कलाकृतीत आपला जीव ओतत असतो. आपण आपल्या कोषातून बाहेर पडून साहित्यकृतीशी एकजीव झालो तर आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. आज चित्रपट, विविध वाहिण्यांमधून कळत-नकळत घाणेरडे संस्कार आपल्या पाल्यावंर पडत आहेत. अशा परिस्थितीत ग्रंथाची संगत केली तर निश्‍चितच आपल्या मनातील वाईट विकार धुवून निघाल्या शिवाय राहणार असे आशावाद वाघ यांनी व्यक्त केला. शेवटी त्यांनी आपली शेतकर्‍यांच्या जीवनाचे चित्रण करणारी ह्यपेचह्ण ही कविता सादर केली. महापौर उज्वला देशमुख यांनी घरातूनच संस्काराचे बीजारोपण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रंथ हे मनाला सुसंस्कारीत करण्याचे काम करीत असतात त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथांची कास धरावी असे आवाहन उज्वला देशमुख यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोपान सातभाई यांनी केले. आभार श्यामराव वाहुरवाघ यांनी मानले. ग्रंथदिंडीने आणली रंगतग्रंथोत्सवाचा आरंभ ग्रंथदिंडीने झाला. खुले नाट्यगृह, गांधी चौक, सिटी कोतवाली, तिलक मार्ग, जुना कापड बाजार, सराफा बाजार, दाना बाजार, जैन मंदीर, गांधी चौक, महापालिका मार्गे प्रमिलाताई ओक हॉल येथे दिंडी पोहोचली. दिंडीत भजनी मंडळ व कलापथकाने सहभाग घेतला व ग्रंथांचे महत्त्व विदित केले.