शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

वीज बिलाचा भरणा करून केला पाणी पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:48 IST

वॉर्ड क्र. ३,४, ५ या तीन वॉर्डांमधील  नागरिकांना मागील दीड महिन्यापासून पाणी पुरवठा केला जात  नव्हता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २४ ऑक्टोबरच्या अंकात  ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर महान ग्रामपंचायतला जाग येऊन  वीज बिलाचा भरणा केला. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत  झाल्याने तीन वॉर्डांतील नागरिकांना आता पाणी मिळणार आहे.

ठळक मुद्देमहानच्या ग्रामपंचायतला आली जाग तीन वॉर्डांतील  नागरिकांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : महान ग्रामपंचायतने वीज बिल न भरल्यामुळे महावि तरण कंपनीने पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा दीड महिन्यां पूर्वी खंडित केला होता. त्यामुळे गावातील दोन वॉर्डांतील  नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करून त्यांना पाणी पुरवठा केला  जात होता; परंतु वॉर्ड क्र. ३,४, ५ या तीन वॉर्डांमधील  नागरिकांना मागील दीड महिन्यापासून पाणी पुरवठा केला जात  नव्हता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २४ ऑक्टोबरच्या अंकात  ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर महान ग्रामपंचायतला जाग येऊन  वीज बिलाचा भरणा केला. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत  झाल्याने तीन वॉर्डांतील नागरिकांना आता पाणी मिळणार आहे. महावितरणचे पाणी पुरवठा योजनेसाठी वीज पुरवठय़ाचे सहा  लाख ५३ हजार २४0 रुपयांचे बिल ग्रामपंचायतकडे थकीत  असल्याने दीड महिन्यांपूर्वी नळ योजनेचा वीज प्रवाह खंडित  करण्यात आला होता. त्यानंतर महानमधील पाच वॉर्डांपैकी वॉर्ड  क्रमांक १ व २ मधील २१ महेल, बिहाडमाथा, चिंचखेड झोपड पट्टीमधील नागरिकांना महाजल योजनेच्या विहिरीमधून पाणी  पुरवठा होत होता; मात्र वॉर्ड क्रमांक ३, ४ व ५ मधील  नागरिकांना पिण्यास पाणी दिले जात नव्हते. तिन्ही वॉर्डांतील  जनता पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून वणवण  भटकत होती. दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना याबाबत  विचारले असता नळ योजनेच्या खात्यामध्ये पैसे नाहीत, पाणी  करवसुली झाल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही, असे  उत्तर दिले जात होते. आज पाणी येईल, उद्या येईल या आशेने  वाट पाहणार्‍या लोकांची सहनशीलता संपल्यानंतर शेवटी २२  ऑक्टोबर रोजी रात्री संतप्त नागरिकांनी महाजल योजनेच्या  विहिरीवरील मुख्य जलवाहिनी व एअर व्हॉल्व्हची तोडफोड  केली होती. याबाबतचे वृत्त २४ ऑक्टोबर रोजी ‘लोकमत’च्या  अंकात ठळकपणे प्रकाशित होताच महान ग्रामपंचायतकडून  मंगळवारी ५0 हजार रुपयांचा धनादेश वीज वितरण कंपनी  बाश्रीटाकळी यांना देण्यात आला. वीज बिलाचा भरणा  केल्यामुळे महावितरणने नळ योजनेचा वीज प्रवाह पुन्हा  जोडला. गावकर्‍यांनी दाखविलेल्या एकीच्या बळाचा विजय  झाल्याची चर्चा लोकांमध्ये होत आहे. 

नळ योजनेच्या खात्यात पैसे नसल्याने वीज बिलाचा भरणा कर ता आला नव्हता; परंतु  महानवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी  होणारा त्रास पाहता ५0 हजार रुपये उसनवारीने घेऊन वीज  बिलाचा भरणा केला आहे. महावितरणाच्या संबंधितांना वीज  जोडणी करण्याबाबत विनवणी केल्याने २४ ऑक्टोबर रोजी  नळ योजनेचा वीज प्रवाह जोडण्यात आला. त्यामुळे काही वंचि त भागात पाण्याचा पुरवठा करण्यात आला. महान  नळजोडणीधारकांनी थकित पाणी कराचा भरणा येत्या  आठ  दिवसात करून ग्रा. पं. प्रशासनाला हातभार सहकार्य करावे.- यास्मिन मो. इरफान, सरपंच, महान.

टॅग्स :Waterपाणी