शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलाचा भरणा करून केला पाणी पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:48 IST

वॉर्ड क्र. ३,४, ५ या तीन वॉर्डांमधील  नागरिकांना मागील दीड महिन्यापासून पाणी पुरवठा केला जात  नव्हता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २४ ऑक्टोबरच्या अंकात  ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर महान ग्रामपंचायतला जाग येऊन  वीज बिलाचा भरणा केला. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत  झाल्याने तीन वॉर्डांतील नागरिकांना आता पाणी मिळणार आहे.

ठळक मुद्देमहानच्या ग्रामपंचायतला आली जाग तीन वॉर्डांतील  नागरिकांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : महान ग्रामपंचायतने वीज बिल न भरल्यामुळे महावि तरण कंपनीने पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा दीड महिन्यां पूर्वी खंडित केला होता. त्यामुळे गावातील दोन वॉर्डांतील  नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करून त्यांना पाणी पुरवठा केला  जात होता; परंतु वॉर्ड क्र. ३,४, ५ या तीन वॉर्डांमधील  नागरिकांना मागील दीड महिन्यापासून पाणी पुरवठा केला जात  नव्हता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २४ ऑक्टोबरच्या अंकात  ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर महान ग्रामपंचायतला जाग येऊन  वीज बिलाचा भरणा केला. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत  झाल्याने तीन वॉर्डांतील नागरिकांना आता पाणी मिळणार आहे. महावितरणचे पाणी पुरवठा योजनेसाठी वीज पुरवठय़ाचे सहा  लाख ५३ हजार २४0 रुपयांचे बिल ग्रामपंचायतकडे थकीत  असल्याने दीड महिन्यांपूर्वी नळ योजनेचा वीज प्रवाह खंडित  करण्यात आला होता. त्यानंतर महानमधील पाच वॉर्डांपैकी वॉर्ड  क्रमांक १ व २ मधील २१ महेल, बिहाडमाथा, चिंचखेड झोपड पट्टीमधील नागरिकांना महाजल योजनेच्या विहिरीमधून पाणी  पुरवठा होत होता; मात्र वॉर्ड क्रमांक ३, ४ व ५ मधील  नागरिकांना पिण्यास पाणी दिले जात नव्हते. तिन्ही वॉर्डांतील  जनता पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून वणवण  भटकत होती. दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना याबाबत  विचारले असता नळ योजनेच्या खात्यामध्ये पैसे नाहीत, पाणी  करवसुली झाल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही, असे  उत्तर दिले जात होते. आज पाणी येईल, उद्या येईल या आशेने  वाट पाहणार्‍या लोकांची सहनशीलता संपल्यानंतर शेवटी २२  ऑक्टोबर रोजी रात्री संतप्त नागरिकांनी महाजल योजनेच्या  विहिरीवरील मुख्य जलवाहिनी व एअर व्हॉल्व्हची तोडफोड  केली होती. याबाबतचे वृत्त २४ ऑक्टोबर रोजी ‘लोकमत’च्या  अंकात ठळकपणे प्रकाशित होताच महान ग्रामपंचायतकडून  मंगळवारी ५0 हजार रुपयांचा धनादेश वीज वितरण कंपनी  बाश्रीटाकळी यांना देण्यात आला. वीज बिलाचा भरणा  केल्यामुळे महावितरणने नळ योजनेचा वीज प्रवाह पुन्हा  जोडला. गावकर्‍यांनी दाखविलेल्या एकीच्या बळाचा विजय  झाल्याची चर्चा लोकांमध्ये होत आहे. 

नळ योजनेच्या खात्यात पैसे नसल्याने वीज बिलाचा भरणा कर ता आला नव्हता; परंतु  महानवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी  होणारा त्रास पाहता ५0 हजार रुपये उसनवारीने घेऊन वीज  बिलाचा भरणा केला आहे. महावितरणाच्या संबंधितांना वीज  जोडणी करण्याबाबत विनवणी केल्याने २४ ऑक्टोबर रोजी  नळ योजनेचा वीज प्रवाह जोडण्यात आला. त्यामुळे काही वंचि त भागात पाण्याचा पुरवठा करण्यात आला. महान  नळजोडणीधारकांनी थकित पाणी कराचा भरणा येत्या  आठ  दिवसात करून ग्रा. पं. प्रशासनाला हातभार सहकार्य करावे.- यास्मिन मो. इरफान, सरपंच, महान.

टॅग्स :Waterपाणी