शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

पातूर : मळसूर येथील ४0 कुटुंबांचे रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 20:51 IST

मळसूर: पातूर तालुक्यातील सर्वाधिक कमी पाऊस पडणार्‍या मळसूर गावातील ४0 पेक्षा जास्त कुटुंबांनी रोजगाराअभावी स्थलांतर केले आहे. शेतकर्‍यांच्या हातचे पीक कमी पावसाने गेले. तसेच बागायती शेती करण्यासाठी विहिरीला पाणी नसल्याने मळसूर येथील शेतकरी व शेतमजूर हवालदिल झालेले आहे.

ठळक मुद्देरोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कमळसूर: पातूर तालुक्यातील सर्वाधिक कमी पाऊस पडणार्‍या मळसूर गावातील ४0 पेक्षा जास्त कुटुंबांनी रोजगाराअभावी स्थलांतर केले आहे.शेतकर्‍यांच्या हातचे पीक कमी पावसाने गेले. तसेच बागायती शेती करण्यासाठी विहिरीला पाणी नसल्याने मळसूर येथील शेतकरी व शेतमजूर हवालदिल झालेले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व हाताला काम नसलेले मजूर व शेतकर्‍यांच्या ४0  कुटुंबांनी उदरनिर्वाह चालविण्यासाठी बारामती, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर इत्यादी शहरामध्ये जाऊन आश्रय घेतला आहे. या कुटुंबांमध्ये मळसूर येथील मंगेश पांडुरंग देवकते, संदीप गणेश देवकते, प्रकाश दशरथ देवकते, सुरेश सदाशिव देवकते, अमोल रमेश आवटे, कपिल मधुकर देवकते, सुनील दयाराम बुंदे, देवानंद प्रभाकर देवकते, सुरेश श्यामराव देवकते, दीपक गजानन देवकते, कैलास दशरथ देवकते, परमेश्‍वर देवकते, अनिल करे, किशोर नारायण तायडे, रामचंद्र विलास कंकाळ, दिनकर कंकाळ, भास्कर कंकाळ, संतोष कंकाळ, पांडुरंग कंकाळ, रवींद्र क्षीरसागर, किरण क्षीरसागर, विलास बरडे, श्रीकृष्ण बरडे, शिवा गायकवाड, शिवा करे, सागर मोरे, संतोष देवकते, अशोक कौळकार, विशाल कवडे, गोपाल करे, रामचंद्र पवार यांच्या कुटुंबासह एकूण ४0 कुटुंबांनी राज्यातील मोठय़ा शहरात स्थलांतर केले आहे. 

यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचे उत्पादन फारच कमी झाले आहे. तसेच बागायती शेतीसाठी पाणी नसल्याने येथील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर पोट भरण्यासाठी बाहेरगावी जाण्याची वेळ आली आहे.- जगदीश देवकते, सरपंच, मळसूर

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणMigrationस्थलांतरण