शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पातूर : मळसूर येथील ४0 कुटुंबांचे रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 20:51 IST

मळसूर: पातूर तालुक्यातील सर्वाधिक कमी पाऊस पडणार्‍या मळसूर गावातील ४0 पेक्षा जास्त कुटुंबांनी रोजगाराअभावी स्थलांतर केले आहे. शेतकर्‍यांच्या हातचे पीक कमी पावसाने गेले. तसेच बागायती शेती करण्यासाठी विहिरीला पाणी नसल्याने मळसूर येथील शेतकरी व शेतमजूर हवालदिल झालेले आहे.

ठळक मुद्देरोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कमळसूर: पातूर तालुक्यातील सर्वाधिक कमी पाऊस पडणार्‍या मळसूर गावातील ४0 पेक्षा जास्त कुटुंबांनी रोजगाराअभावी स्थलांतर केले आहे.शेतकर्‍यांच्या हातचे पीक कमी पावसाने गेले. तसेच बागायती शेती करण्यासाठी विहिरीला पाणी नसल्याने मळसूर येथील शेतकरी व शेतमजूर हवालदिल झालेले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व हाताला काम नसलेले मजूर व शेतकर्‍यांच्या ४0  कुटुंबांनी उदरनिर्वाह चालविण्यासाठी बारामती, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर इत्यादी शहरामध्ये जाऊन आश्रय घेतला आहे. या कुटुंबांमध्ये मळसूर येथील मंगेश पांडुरंग देवकते, संदीप गणेश देवकते, प्रकाश दशरथ देवकते, सुरेश सदाशिव देवकते, अमोल रमेश आवटे, कपिल मधुकर देवकते, सुनील दयाराम बुंदे, देवानंद प्रभाकर देवकते, सुरेश श्यामराव देवकते, दीपक गजानन देवकते, कैलास दशरथ देवकते, परमेश्‍वर देवकते, अनिल करे, किशोर नारायण तायडे, रामचंद्र विलास कंकाळ, दिनकर कंकाळ, भास्कर कंकाळ, संतोष कंकाळ, पांडुरंग कंकाळ, रवींद्र क्षीरसागर, किरण क्षीरसागर, विलास बरडे, श्रीकृष्ण बरडे, शिवा गायकवाड, शिवा करे, सागर मोरे, संतोष देवकते, अशोक कौळकार, विशाल कवडे, गोपाल करे, रामचंद्र पवार यांच्या कुटुंबासह एकूण ४0 कुटुंबांनी राज्यातील मोठय़ा शहरात स्थलांतर केले आहे. 

यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचे उत्पादन फारच कमी झाले आहे. तसेच बागायती शेतीसाठी पाणी नसल्याने येथील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर पोट भरण्यासाठी बाहेरगावी जाण्याची वेळ आली आहे.- जगदीश देवकते, सरपंच, मळसूर

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणMigrationस्थलांतरण