शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 23:55 IST

Passenger Trains पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे सामान्य प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देपॅसेंजर गाड्या गरीब प्रवाशांसाठी उपयुक्त होत्या. या गाड्या बंद असल्यामुळे गरीब प्रवाशांची गैरसोय होत आहे.

अकोला : लॉकडाऊनची बंधने शिथील झाल्यानंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत रेल्वेने प्रवासी वाहतुक सुुरु केली असली, तरी सध्या केवळ आरक्षणावरच प्रवास करण्याची सुविधा असलेल्या विशेष गाड्या धावत आहेत. सर्वसामान्यांमध्ये लोकप्रीय असलेल्या पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे सामान्य प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे. विशेष गाड्यांचे भाडेही अधिक असल्याने या गाड्यांमध्ये प्रवास करताना गरीब प्रवाशांची होरपळ होत आहे.लॉकडाऊनदरम्यान रेल्वेचे प्रवासी वाहतुक बंदच होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याच्या पृष्ठभूमीवर रेल्वेने एका राज्यातून दुसर्या राज्यात जाण्यासाठी विशेष गाड्या सुरु केल्या असून, या गाड्यांमध्ये राज्यांतर्गत प्रवास करण्याचीही मुभा आहे. मध्य व दक्षीण मध्य रेल्वेचे जंक्शन स्टेशन असलेल्या अकोल्यावरूनही विशेष गाड्या धावत असल्यामुळे प्रवाशांची सोय झाली. तथापी, केवळ आरक्षीत तिकीटांवरच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करता येतो. वेळेवरच्या प्रवासासाठी आरक्षण उपलब्ध होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना या विशेष गाड्यांचा उपयोग होत नसल्याचे वास्तव आहे. लॉकडाऊनपूर्वी सुरु असलेल्या पॅसेंजर गाड्या गरीब प्रवाशांसाठी उपयुक्त होत्या. आता या गाड्या बंद असल्यामुळे गरीब प्रवाशांची गैरसोय होत आहे.

विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस सुरु

सध्या अकोला मार्गे विशेष गाड्या धावत असून, या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, तर दक्षीण-मध्य रेल्वेच्या नांदेड-श्रीगंगानगर, जयपूर-सिकंदराबाद, अमरावती-तिरुपती आदी गाड्यांचा समावेश आहे.

 

वर्धा-भूसावळ पॅसेंजर बंद

लॉकडाऊनपूर्वी अकोला स्थानकावरून भूसावळ-वर्धा, नरखेड-भूसावळ या मध्य रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या सुरु होत्या. या दोन्ही गाड्या प्रवाशांसाठी सोयीस्कर व भाड्याच्या दृष्टीने परवडणार्या होत्या. याशिवाय दक्षीण-मध्य रेल्वेच्या अकोला-पूर्णा व अकोला-परळी या पॅसेंजर गाड्याही प्रवाशांसाठी उपयुक्त होत्या. आता या गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

पॅसेंजर गाड्या बंद असल्याने विशेष गाड्यांमधून अधिक भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. आयत्या वेळी प्रवास करावयाचा झाल्यास प्रवाशांना एसटी बस किंवा खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. पॅसेंजर गाड्यांचे भाडे सामान्यांच्या खिशाला परवडणारे आहे. त्यामुळे या गाड्या सुरु करण्यात याव्या.

- अमोल इंगळे, प्रवासी संघटना

टॅग्स :AkolaअकोलाIndian Railwayभारतीय रेल्वे