शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

तेल्हारा राज्यमार्गावरील खड्ड्यांनी प्रवाशी वैतागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:18 IST

तेल्हाऱ्याचे नाव काढले की, अंगावर काटाच उभा राहत असल्याने अनेकांनी तेल्हारा येणे तर सोडाच, तेल्हारावरून जाणेही टाळणे सुरू केले ...

तेल्हाऱ्याचे नाव काढले की, अंगावर काटाच उभा राहत असल्याने अनेकांनी तेल्हारा येणे तर सोडाच, तेल्हारावरून जाणेही टाळणे सुरू केले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून वरवट, तेल्हारा, वणीवारूळा, आडसूळ, तेल्हारा-हिवरखेड रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामात दुर्लक्ष केल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला दंड ठोठावला. तरीही समस्या मार्गी लागली नाही. सद्यस्थितीत मुख्य रस्त्यावर इतकी भीषण परिस्थिती आहे की, साधे दुचाकी वाहन सुद्धा व्यवस्थित चालू शकत नाही. या सर्व रस्त्यावर गिट्टी व माती पडलेली असून वाहनांची व नागरिकांच्या मणक्याची पार वाट लागत आहे . रस्त्यावर दररोज अपघाताच्या घटना घडतात. यामध्ये काहींना जीव गमावला लागला. रस्त्यावर इतकी धूळ साचली आहे. धुळीमुळे चारचाकी वाहन तसेच बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना समोरचे काहीच दिसत नाही. गेल्या दोन वर्षांपासून जनतेला सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिक व ये-जा करणारे प्रवाशी वैतागले आहेत. रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसत असून पिकांवर मोठ्या प्रमाणात धूळ बसत असल्याने, पिकांची वाढ खुंटली आहे.

कंत्राटदार समोर लोकप्रतिनिधी व अधिकारी हतबल झाले आहेत. रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी अनेकदा बैठक घेऊन काम सुरू करण्यासाठी निर्देश दिले. परंतु कंत्राटदाराची आर्थिक बाजू सक्षम नसल्याने काम बंद पडले आहे. तेल्हारा मुख्य रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जनतेने केली आहे.

फोटो :