शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

तेल्हारा राज्यमार्गावरील खड्ड्यांनी प्रवाशी वैतागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:18 IST

तेल्हाऱ्याचे नाव काढले की, अंगावर काटाच उभा राहत असल्याने अनेकांनी तेल्हारा येणे तर सोडाच, तेल्हारावरून जाणेही टाळणे सुरू केले ...

तेल्हाऱ्याचे नाव काढले की, अंगावर काटाच उभा राहत असल्याने अनेकांनी तेल्हारा येणे तर सोडाच, तेल्हारावरून जाणेही टाळणे सुरू केले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून वरवट, तेल्हारा, वणीवारूळा, आडसूळ, तेल्हारा-हिवरखेड रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामात दुर्लक्ष केल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला दंड ठोठावला. तरीही समस्या मार्गी लागली नाही. सद्यस्थितीत मुख्य रस्त्यावर इतकी भीषण परिस्थिती आहे की, साधे दुचाकी वाहन सुद्धा व्यवस्थित चालू शकत नाही. या सर्व रस्त्यावर गिट्टी व माती पडलेली असून वाहनांची व नागरिकांच्या मणक्याची पार वाट लागत आहे . रस्त्यावर दररोज अपघाताच्या घटना घडतात. यामध्ये काहींना जीव गमावला लागला. रस्त्यावर इतकी धूळ साचली आहे. धुळीमुळे चारचाकी वाहन तसेच बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना समोरचे काहीच दिसत नाही. गेल्या दोन वर्षांपासून जनतेला सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिक व ये-जा करणारे प्रवाशी वैतागले आहेत. रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसत असून पिकांवर मोठ्या प्रमाणात धूळ बसत असल्याने, पिकांची वाढ खुंटली आहे.

कंत्राटदार समोर लोकप्रतिनिधी व अधिकारी हतबल झाले आहेत. रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी अनेकदा बैठक घेऊन काम सुरू करण्यासाठी निर्देश दिले. परंतु कंत्राटदाराची आर्थिक बाजू सक्षम नसल्याने काम बंद पडले आहे. तेल्हारा मुख्य रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जनतेने केली आहे.

फोटो :