शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ४७ लाखांचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:14 IST

कोरोनामुळे गत दीड वर्षापासून एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. वारंवार लागणाऱ्या निर्बंधांमुळे बसेसचे उत्पन्न घटले असून, प्रवासीही मिळत ...

कोरोनामुळे गत दीड वर्षापासून एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. वारंवार लागणाऱ्या निर्बंधांमुळे बसेसचे उत्पन्न घटले असून, प्रवासीही मिळत नसल्याचे दिसून येते. आता अनलॉकमध्ये काही प्रमाणात फेऱ्या सुरू झाल्या आहे. त्यामुळे थोडे-फार उत्पन्न हाती लागत आहे. हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात, तर अधिक जण परिवहन महामंडळ, तसेच खासगी वाहनाद्वारे पंढरीची वाट धरतात. जे वारकरी पायी पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते एसटीने वारी करतात. एसटी महामंडळाला यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते. कोरोना काळात सर्व यात्रा, उत्सव बंद आहे. परिणामी, या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागत आहे. सलग दुसऱ्या वर्षी ४७ लाखांचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे.

बसेस दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जायच्या २६५

त्यातून एसटीला उत्पन्न मिळायचे? ४७,३९,०००

प्रवासी एसटीतून दरवर्षी प्रवास करायचे? ३८,४३२

जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या

अकोला जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पालख्या पंढरपूर वारीला जातात. यामध्ये नाना उजवणे यांची पालखी, गजानन महाराज संस्थान बोरगाव, विठ्ठल रुखुमाई संस्थान सोमठाणा या पालख्यांचा समावेश आहे, तसेच संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव, वासुदेव महाराज श्रद्धासागर अकोट येथील पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. या पालख्यांसोबत हजारो वारकरी पायी वारी करतात.

यंदा एसटीने एकही पालखी नाही!

राज्यभरातून काही मानाच्या पालख्या एसटी बसच्या माध्यमातून पंढरपूरला पोहोचणार आहेत, परंतु अकोला जिल्ह्यातून एकाही पालखीची निवड झाली नाही. त्यामुळे एसटी बसने एकही पालखी जाणार नसल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.

वारकऱ्यांचेही गावी मन रमेना!

दरवर्षी पंढरपूरची वारी करत असतो. आतापर्यंत पंढरपूरच्या १९ वाऱ्या केल्या आहे, परंतु गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे पंढरपूर यात्राही रद्द करण्यात आल्याने वारी बंद आहे. यंदा घरूनच विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

- मधुकर राहुडकर

वारी हेच वारकऱ्याचे जीवन आहे. वारी नाही, तर आमचे जीवन शून्य आहे. सरकारच्या नियमांचे आम्ही स्वागत करतो. मात्र, पंढरपूरला जाता नाही आले, तरी शासनाने गावखेड्यातील विठ्ठलाचे एखादे मंदिर खुले करावे.

- काशिनाथ कर्णेवार

कोरोनाचाही फटका!

कोरोनाचाही मोठा फटका एसटीला सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही परिवहन सेवा सुमारे दोन ते अडीच महिने बंद होती. परिणामी, महामंडळाची आर्थिक स्थिती अधिकच खालावली आहे. आता आषाढी वारी रद्द झाल्याने लालपरी आर्थिक संकटात सापडणार आहे.