शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ४७ लाखांचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:14 IST

कोरोनामुळे गत दीड वर्षापासून एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. वारंवार लागणाऱ्या निर्बंधांमुळे बसेसचे उत्पन्न घटले असून, प्रवासीही मिळत ...

कोरोनामुळे गत दीड वर्षापासून एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. वारंवार लागणाऱ्या निर्बंधांमुळे बसेसचे उत्पन्न घटले असून, प्रवासीही मिळत नसल्याचे दिसून येते. आता अनलॉकमध्ये काही प्रमाणात फेऱ्या सुरू झाल्या आहे. त्यामुळे थोडे-फार उत्पन्न हाती लागत आहे. हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात, तर अधिक जण परिवहन महामंडळ, तसेच खासगी वाहनाद्वारे पंढरीची वाट धरतात. जे वारकरी पायी पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते एसटीने वारी करतात. एसटी महामंडळाला यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते. कोरोना काळात सर्व यात्रा, उत्सव बंद आहे. परिणामी, या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागत आहे. सलग दुसऱ्या वर्षी ४७ लाखांचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे.

बसेस दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जायच्या २६५

त्यातून एसटीला उत्पन्न मिळायचे? ४७,३९,०००

प्रवासी एसटीतून दरवर्षी प्रवास करायचे? ३८,४३२

जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या

अकोला जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पालख्या पंढरपूर वारीला जातात. यामध्ये नाना उजवणे यांची पालखी, गजानन महाराज संस्थान बोरगाव, विठ्ठल रुखुमाई संस्थान सोमठाणा या पालख्यांचा समावेश आहे, तसेच संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव, वासुदेव महाराज श्रद्धासागर अकोट येथील पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. या पालख्यांसोबत हजारो वारकरी पायी वारी करतात.

यंदा एसटीने एकही पालखी नाही!

राज्यभरातून काही मानाच्या पालख्या एसटी बसच्या माध्यमातून पंढरपूरला पोहोचणार आहेत, परंतु अकोला जिल्ह्यातून एकाही पालखीची निवड झाली नाही. त्यामुळे एसटी बसने एकही पालखी जाणार नसल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.

वारकऱ्यांचेही गावी मन रमेना!

दरवर्षी पंढरपूरची वारी करत असतो. आतापर्यंत पंढरपूरच्या १९ वाऱ्या केल्या आहे, परंतु गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे पंढरपूर यात्राही रद्द करण्यात आल्याने वारी बंद आहे. यंदा घरूनच विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

- मधुकर राहुडकर

वारी हेच वारकऱ्याचे जीवन आहे. वारी नाही, तर आमचे जीवन शून्य आहे. सरकारच्या नियमांचे आम्ही स्वागत करतो. मात्र, पंढरपूरला जाता नाही आले, तरी शासनाने गावखेड्यातील विठ्ठलाचे एखादे मंदिर खुले करावे.

- काशिनाथ कर्णेवार

कोरोनाचाही फटका!

कोरोनाचाही मोठा फटका एसटीला सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही परिवहन सेवा सुमारे दोन ते अडीच महिने बंद होती. परिणामी, महामंडळाची आर्थिक स्थिती अधिकच खालावली आहे. आता आषाढी वारी रद्द झाल्याने लालपरी आर्थिक संकटात सापडणार आहे.