शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील कपाशी नुकसानाचे पंचनामे; दहा दिवसांत अहवाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:42 IST

अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे  पंचनामे करून, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उ पजिल्हाधिकारी (आरडीसी) श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील  तहसीलदारांना दिले.

ठळक मुद्देबोंडअळीचा प्रादुर्भाव ‘आरडीसीं’चे तहसीलदारांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे  पंचनामे करून, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उ पजिल्हाधिकारी (आरडीसी) श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील  तहसीलदारांना दिले.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी  कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्या तील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे  नुकसान झाले आहे. तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही  नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित  शेतकर्‍यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे तातडीने  पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत ७ डिसेंबर रोजी  जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्ह्यातील  तहसीलदारांची बैठक घेतली. पथके गठित करून, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने  नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून,  अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत  देशपांडे यांनी तहसीलदारांना दिले. या बैठकीला अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर  हांडे, पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी, मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे  यांच्यासह जिल्ह्यातील सातही तहसीलदार उपस्थित होते.

‘या’ पथकांमार्फत होणार पंचनामे!कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तालुका स्तरावर पथके गठित  करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार संबंधित तलाठी, कृषी सहायक व  ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या पथकांमार्फत जिल्ह्यातील कपाशी पीक  नुकसानाचे पंचनामे करण्यात येणार आहेत.

सहा हजारांवर शेतकर्‍यांच्या तक्रारी!बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाल्याबाबत जिल्ह्यात  कृषी विभागामार्फत बाधित कापूस उत्पादक शेतकर्‍यांकडून तक्रार अर्ज  स्वीकारण्यात येत आहेत. ८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात सहा हजारांपेक्षा जास्त शे तकर्‍यांनी कापूस पिकाचे नुकसान झाल्याबाबतचे तक्रार अर्ज कृषी विभागाकडे  सादर केले.

पालकमंत्री आज घेणार बैठक!गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात कपाशी पिकाचे झालेले नुकसान आणि  कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्याच्या मुद्यावर पालकमंत्री डॉ. रणजित  पाटील शनिवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील  नियोजन सभागृहात संबंधित विभागप्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत.  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी या  बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :cottonकापूसAkola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण