शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

अकोला जिल्ह्यातील कपाशी नुकसानाचे पंचनामे; दहा दिवसांत अहवाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:42 IST

अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे  पंचनामे करून, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उ पजिल्हाधिकारी (आरडीसी) श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील  तहसीलदारांना दिले.

ठळक मुद्देबोंडअळीचा प्रादुर्भाव ‘आरडीसीं’चे तहसीलदारांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे  पंचनामे करून, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उ पजिल्हाधिकारी (आरडीसी) श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील  तहसीलदारांना दिले.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी  कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्या तील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे  नुकसान झाले आहे. तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही  नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित  शेतकर्‍यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे तातडीने  पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत ७ डिसेंबर रोजी  जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्ह्यातील  तहसीलदारांची बैठक घेतली. पथके गठित करून, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने  नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून,  अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत  देशपांडे यांनी तहसीलदारांना दिले. या बैठकीला अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर  हांडे, पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी, मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे  यांच्यासह जिल्ह्यातील सातही तहसीलदार उपस्थित होते.

‘या’ पथकांमार्फत होणार पंचनामे!कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तालुका स्तरावर पथके गठित  करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार संबंधित तलाठी, कृषी सहायक व  ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या पथकांमार्फत जिल्ह्यातील कपाशी पीक  नुकसानाचे पंचनामे करण्यात येणार आहेत.

सहा हजारांवर शेतकर्‍यांच्या तक्रारी!बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाल्याबाबत जिल्ह्यात  कृषी विभागामार्फत बाधित कापूस उत्पादक शेतकर्‍यांकडून तक्रार अर्ज  स्वीकारण्यात येत आहेत. ८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात सहा हजारांपेक्षा जास्त शे तकर्‍यांनी कापूस पिकाचे नुकसान झाल्याबाबतचे तक्रार अर्ज कृषी विभागाकडे  सादर केले.

पालकमंत्री आज घेणार बैठक!गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात कपाशी पिकाचे झालेले नुकसान आणि  कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्याच्या मुद्यावर पालकमंत्री डॉ. रणजित  पाटील शनिवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील  नियोजन सभागृहात संबंधित विभागप्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत.  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी या  बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :cottonकापूसAkola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण