शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 13:37 IST

फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे कृषी विभागाच्या चमूद्वारे बुधवारपासून करण्यात येणार आहेत.

- संतोष येलकर

अकोला: पिकांवर कीटकनाशकांच्या फवारणीतून जिल्ह्यात शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे कृषी विभागाच्या चमूद्वारे बुधवारपासून करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या घरी जाऊन घटनांची माहिती घेण्यात येणार आहे.जिल्ह्यात कपाशी व सोयाबीन पिकावर विविध कीड व रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवरील कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी-शेतमजुरांकडून कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे; परंतु जिल्ह्यात गत दोन महिन्यांच्या कालावधीत कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. जिल्ह्यातील विविध भागात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने, १० सप्टेंबरपर्यंत १३८ शेतकरी -शेतमजुरांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. कीटनाशकांच्या फवारणीतून विषबाधाच्या घटना वाढल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील विषबाधाच्या घटनांचे पंचनामे जिल्हा कृषी विभागाच्या चमूद्वारे ११ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या घरी जाऊन, त्यांच्याकडून विषबाधा घटनेची माहिती घेण्यात येणार आहे. कृषी विभागांतर्गत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितींचे कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, सत्र अधिकारी, मोहीम अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या चमूद्वारे विषबाधाच्या घटनांचे पंचनामे करण्यात येणार असून, त्यामध्ये घेण्यात आलेल्या माहितीचा अहवाल सात दिवसांत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.पंचनाम्यात अशी घेण्यात येणार माहिती!कृषी विभागाचे अधिकारी विषबाधा झालेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या घरी जाऊन विषबाधाच्या घटनांचे पंचनामे करणार आहेत. त्यामध्ये कोणते कीटनाशक फवारणी करताना विषबाधा झाली, विषबाधेचे कारण कोणते होते, कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा होऊ नये म्हणून आवश्यक असलेल्या उपाययोजना केल्या होत्या काय, यासंदर्भात माहिती घेण्यात येणार आहे.१३८ शेतकऱ्यांना विषबाधा; २८ शेतकºयांवर उपचार सुरू!जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने १० सप्टेंबरपर्यंत १३८ शेतकरी-शेतमजुरांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी ११० शेतकºयांना उपचारानंतर सुटी देण्यात आली असून, विषबाधा झालेल्या २८ शेतकरी-शेतमजुरांवर अद्याप सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याच्या घटनांचे पंचनामे ११ सप्टेंबरपासून कृषी विभागाच्या अधिकाºयांमार्फत करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विषबाधा झालेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या घरी जाऊन विषबाधेच्या घटना व कारणांची माहिती घेण्यात येणार आहे.- मिलिंद जंजाळमोहीम अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी