शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 13:37 IST

फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे कृषी विभागाच्या चमूद्वारे बुधवारपासून करण्यात येणार आहेत.

- संतोष येलकर

अकोला: पिकांवर कीटकनाशकांच्या फवारणीतून जिल्ह्यात शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधेच्या घटनांचे पंचनामे कृषी विभागाच्या चमूद्वारे बुधवारपासून करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या घरी जाऊन घटनांची माहिती घेण्यात येणार आहे.जिल्ह्यात कपाशी व सोयाबीन पिकावर विविध कीड व रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवरील कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी-शेतमजुरांकडून कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे; परंतु जिल्ह्यात गत दोन महिन्यांच्या कालावधीत कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. जिल्ह्यातील विविध भागात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने, १० सप्टेंबरपर्यंत १३८ शेतकरी -शेतमजुरांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. कीटनाशकांच्या फवारणीतून विषबाधाच्या घटना वाढल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील विषबाधाच्या घटनांचे पंचनामे जिल्हा कृषी विभागाच्या चमूद्वारे ११ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या घरी जाऊन, त्यांच्याकडून विषबाधा घटनेची माहिती घेण्यात येणार आहे. कृषी विभागांतर्गत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितींचे कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, सत्र अधिकारी, मोहीम अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या चमूद्वारे विषबाधाच्या घटनांचे पंचनामे करण्यात येणार असून, त्यामध्ये घेण्यात आलेल्या माहितीचा अहवाल सात दिवसांत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.पंचनाम्यात अशी घेण्यात येणार माहिती!कृषी विभागाचे अधिकारी विषबाधा झालेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या घरी जाऊन विषबाधाच्या घटनांचे पंचनामे करणार आहेत. त्यामध्ये कोणते कीटनाशक फवारणी करताना विषबाधा झाली, विषबाधेचे कारण कोणते होते, कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा होऊ नये म्हणून आवश्यक असलेल्या उपाययोजना केल्या होत्या काय, यासंदर्भात माहिती घेण्यात येणार आहे.१३८ शेतकऱ्यांना विषबाधा; २८ शेतकºयांवर उपचार सुरू!जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने १० सप्टेंबरपर्यंत १३८ शेतकरी-शेतमजुरांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी ११० शेतकºयांना उपचारानंतर सुटी देण्यात आली असून, विषबाधा झालेल्या २८ शेतकरी-शेतमजुरांवर अद्याप सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याच्या घटनांचे पंचनामे ११ सप्टेंबरपासून कृषी विभागाच्या अधिकाºयांमार्फत करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विषबाधा झालेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या घरी जाऊन विषबाधेच्या घटना व कारणांची माहिती घेण्यात येणार आहे.- मिलिंद जंजाळमोहीम अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी