शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पणजच्या केळी उत्पादकांना मिळणार पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागीलवर्षीचा विमा कमी प्रमाणात मिळाला होता. पीक विम्यापासून वंचित ...

अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागीलवर्षीचा विमा कमी प्रमाणात मिळाला होता. पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ रक्कम अदा करावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला यश आले असून, कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी तातडीने आदेश काढून भारतीय कृषी विमा कंपनीने ६५ लाख रुपयांचा विमा पणज मंडळातील शेतकऱ्यांना द्यावा, असे लेखी आदेश काढले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम अदा करावी, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चालूवर्षी २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई मिळावी, पीक विमा कंपन्यांनी २०१५ ते २०२१ यादरम्यान केलेल्या कारभाराची तसेच पत्रव्यवहाराची माहिती देणारी श्वेतपत्रिका काढावी, पीकविमा योजनेची वेबसाईट मराठीत काढावी, मागील पाच वर्षांमधील पीकविमा कंपन्यांचे ऑडिट करावे यांसह विविध मागण्या करीत पुण्यातील कृषी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून कार्यालय दणाणून सोडण्यात आले. कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचे पाहून कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी बोलाविले. तब्बल तीन तास सर्व प्रश्नांवर खलबते झाली. आयुक्तांनी अनेक मुद्यांवर संमती दर्शविली आणि मागण्या तत्त्वत: मान्य केल्या. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे धीरजकुमार यांनी सांगितले. यावेळी मुख्य सांख्यिकी अधिकारी उदय देशमुख उपस्थित होते.

या आंदोलनात 'स्वाभिमानी'चे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले, प्रकाशतात्या बालवडकर, अमर कदम, विनातक सरनाईक, विकास देशमुख, अनिल रोकडे, प्रदीप ठाकूर, सचिन पांडुळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

(फोटो)

-----------------

विमा कंपनीच्या तत्कालीन जिल्हा प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश

भारतीय कृषी विमा कंपनीच्या तत्कालीन अकोला जिल्हा प्रतिनिधीवर अकोट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. विम्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.