शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

पणजच्या केळी उत्पादकांना मिळणार पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागीलवर्षीचा विमा कमी प्रमाणात मिळाला होता. पीक विम्यापासून वंचित ...

अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागीलवर्षीचा विमा कमी प्रमाणात मिळाला होता. पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ रक्कम अदा करावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला यश आले असून, कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी तातडीने आदेश काढून भारतीय कृषी विमा कंपनीने ६५ लाख रुपयांचा विमा पणज मंडळातील शेतकऱ्यांना द्यावा, असे लेखी आदेश काढले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम अदा करावी, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चालूवर्षी २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई मिळावी, पीक विमा कंपन्यांनी २०१५ ते २०२१ यादरम्यान केलेल्या कारभाराची तसेच पत्रव्यवहाराची माहिती देणारी श्वेतपत्रिका काढावी, पीकविमा योजनेची वेबसाईट मराठीत काढावी, मागील पाच वर्षांमधील पीकविमा कंपन्यांचे ऑडिट करावे यांसह विविध मागण्या करीत पुण्यातील कृषी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून कार्यालय दणाणून सोडण्यात आले. कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचे पाहून कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी बोलाविले. तब्बल तीन तास सर्व प्रश्नांवर खलबते झाली. आयुक्तांनी अनेक मुद्यांवर संमती दर्शविली आणि मागण्या तत्त्वत: मान्य केल्या. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे धीरजकुमार यांनी सांगितले. यावेळी मुख्य सांख्यिकी अधिकारी उदय देशमुख उपस्थित होते.

या आंदोलनात 'स्वाभिमानी'चे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले, प्रकाशतात्या बालवडकर, अमर कदम, विनातक सरनाईक, विकास देशमुख, अनिल रोकडे, प्रदीप ठाकूर, सचिन पांडुळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

(फोटो)

-----------------

विमा कंपनीच्या तत्कालीन जिल्हा प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश

भारतीय कृषी विमा कंपनीच्या तत्कालीन अकोला जिल्हा प्रतिनिधीवर अकोट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. विम्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.