शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

पणजच्या केळी उत्पादकांना मिळणार पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागीलवर्षीचा विमा कमी प्रमाणात मिळाला होता. पीक विम्यापासून वंचित ...

अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पणज मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागीलवर्षीचा विमा कमी प्रमाणात मिळाला होता. पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ रक्कम अदा करावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला यश आले असून, कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी तातडीने आदेश काढून भारतीय कृषी विमा कंपनीने ६५ लाख रुपयांचा विमा पणज मंडळातील शेतकऱ्यांना द्यावा, असे लेखी आदेश काढले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम अदा करावी, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चालूवर्षी २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई मिळावी, पीक विमा कंपन्यांनी २०१५ ते २०२१ यादरम्यान केलेल्या कारभाराची तसेच पत्रव्यवहाराची माहिती देणारी श्वेतपत्रिका काढावी, पीकविमा योजनेची वेबसाईट मराठीत काढावी, मागील पाच वर्षांमधील पीकविमा कंपन्यांचे ऑडिट करावे यांसह विविध मागण्या करीत पुण्यातील कृषी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून कार्यालय दणाणून सोडण्यात आले. कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचे पाहून कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी बोलाविले. तब्बल तीन तास सर्व प्रश्नांवर खलबते झाली. आयुक्तांनी अनेक मुद्यांवर संमती दर्शविली आणि मागण्या तत्त्वत: मान्य केल्या. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे धीरजकुमार यांनी सांगितले. यावेळी मुख्य सांख्यिकी अधिकारी उदय देशमुख उपस्थित होते.

या आंदोलनात 'स्वाभिमानी'चे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले, प्रकाशतात्या बालवडकर, अमर कदम, विनातक सरनाईक, विकास देशमुख, अनिल रोकडे, प्रदीप ठाकूर, सचिन पांडुळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

(फोटो)

-----------------

विमा कंपनीच्या तत्कालीन जिल्हा प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश

भारतीय कृषी विमा कंपनीच्या तत्कालीन अकोला जिल्हा प्रतिनिधीवर अकोट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. विम्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.