शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

 पॅन कार्ड क्लबमधील गुंतवणूदार सापडले अधांतरी: ७००० कोटींची वसुली; परताव्याची रक्कम मात्र अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 14:15 IST

अकोला : सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप नोंदविल्यामुळे अडचणीत आलेल्या पॅन कार्ड क्लबमधील हजारो गुंतवणूकदार अधांतरी सापडले आहेत. कंपनी मालकीच्या जप्तीच्या कारवाईतून ७००० कोटींची वसुली करण्यात आली असली, तरी परताव्याची रक्कम फुगतच आहे

ठळक मुद्देकोट्यवधीच्या या रकमेच्या भरवशावर कंपनीच्या संचालकांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी, तसेच गोवा, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी ठिकाणी जंगम मालमत्ता घेतली.कंपनीचे जाळे आणि स्वरूप राज्यभरात विस्तारित होत असताना आणि हजारो लोकांची गुंतवणूक क्लबमध्ये झाल्यानंतर नियमांवर बोट ठेवून सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेत ठेवी गोठविल्या. गुंतवणूकदारांना परतावा द्यावा म्हणून सेबीने देशभरातील पॅनकार्ड क्लबची जंगम मालमत्ता जप्त करून लिलाव केला.

अकोला : सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप नोंदविल्यामुळे अडचणीत आलेल्या पॅन कार्ड क्लबमधील हजारो गुंतवणूकदार अधांतरी सापडले आहेत. कंपनी मालकीच्या जप्तीच्या कारवाईतून ७००० कोटींची वसुली करण्यात आली असली, तरी परताव्याची रक्कम फुगतच आहे. त्यामुळे सेबीने अद्याप गुंतवणूकदारांना परतावा दिलेला नाही. त्यामुळे गुंतवणूकदार संतापले असून, आता त्यांचे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे.पोटाला चिमटा देत पै-पै जोडून पॅन कार्ड क्लबमध्ये हजारो लोकांनी गुंतवणूक केली. कोट्यवधीच्या या रकमेच्या भरवशावर कंपनीच्या संचालकांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी, तसेच गोवा, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी ठिकाणी जंगम मालमत्ता घेतली. कंपनीचे जाळे आणि स्वरूप राज्यभरात विस्तारित होत असताना आणि हजारो लोकांची गुंतवणूक क्लबमध्ये झाल्यानंतर नियमांवर बोट ठेवून सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेत ठेवी गोठविल्या. यामध्ये अनेक कंपन्यादेखील सापडल्यात. सर्वसामान्यांचे घामाचे दाम कंपनीत अडकून असल्याने आंदोलन उभे झाले. थेट देशाचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लक्ष घालून न्याय देण्याचे आश्वासन दिलेत. गुंतवणूकदारांना परतावा द्यावा म्हणून सेबीने देशभरातील पॅनकार्ड क्लबची जंगम मालमत्ता जप्त करून लिलाव केला. त्यातून आतापर्यंत ७००० कोटींची वसुली करण्यात आली. आता रक्कम मिळणार असल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्यात. पण वसुलीपेक्षा जास्त रक्कम परताव्यासाठी हवी असल्याने सेबीने कारवाई थांबविली. सेबीने २३ जानेवारी १८ रोजी याबाबत सुनावणी केली. दरम्यान, पॅनकार्ड क्लबच्या सीएमडीची संपत्ती फेब्रुवारीत जप्त केली जाणार होती. दरम्यान, गुंतवणूकदारांनी संतुलन गमाविल्याने २६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी मोर्चा सेबीवर काढला गेला. सेबीची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप होत असून, गुंतवणूकदारांना रक्कम मिळण्याची आशा धुसर झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाEconomyअर्थव्यवस्था