शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

 पॅन कार्ड क्लबमधील गुंतवणूदार सापडले अधांतरी: ७००० कोटींची वसुली; परताव्याची रक्कम मात्र अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 14:15 IST

अकोला : सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप नोंदविल्यामुळे अडचणीत आलेल्या पॅन कार्ड क्लबमधील हजारो गुंतवणूकदार अधांतरी सापडले आहेत. कंपनी मालकीच्या जप्तीच्या कारवाईतून ७००० कोटींची वसुली करण्यात आली असली, तरी परताव्याची रक्कम फुगतच आहे

ठळक मुद्देकोट्यवधीच्या या रकमेच्या भरवशावर कंपनीच्या संचालकांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी, तसेच गोवा, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी ठिकाणी जंगम मालमत्ता घेतली.कंपनीचे जाळे आणि स्वरूप राज्यभरात विस्तारित होत असताना आणि हजारो लोकांची गुंतवणूक क्लबमध्ये झाल्यानंतर नियमांवर बोट ठेवून सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेत ठेवी गोठविल्या. गुंतवणूकदारांना परतावा द्यावा म्हणून सेबीने देशभरातील पॅनकार्ड क्लबची जंगम मालमत्ता जप्त करून लिलाव केला.

अकोला : सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप नोंदविल्यामुळे अडचणीत आलेल्या पॅन कार्ड क्लबमधील हजारो गुंतवणूकदार अधांतरी सापडले आहेत. कंपनी मालकीच्या जप्तीच्या कारवाईतून ७००० कोटींची वसुली करण्यात आली असली, तरी परताव्याची रक्कम फुगतच आहे. त्यामुळे सेबीने अद्याप गुंतवणूकदारांना परतावा दिलेला नाही. त्यामुळे गुंतवणूकदार संतापले असून, आता त्यांचे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे.पोटाला चिमटा देत पै-पै जोडून पॅन कार्ड क्लबमध्ये हजारो लोकांनी गुंतवणूक केली. कोट्यवधीच्या या रकमेच्या भरवशावर कंपनीच्या संचालकांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी, तसेच गोवा, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी ठिकाणी जंगम मालमत्ता घेतली. कंपनीचे जाळे आणि स्वरूप राज्यभरात विस्तारित होत असताना आणि हजारो लोकांची गुंतवणूक क्लबमध्ये झाल्यानंतर नियमांवर बोट ठेवून सेबी आणि रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेत ठेवी गोठविल्या. यामध्ये अनेक कंपन्यादेखील सापडल्यात. सर्वसामान्यांचे घामाचे दाम कंपनीत अडकून असल्याने आंदोलन उभे झाले. थेट देशाचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लक्ष घालून न्याय देण्याचे आश्वासन दिलेत. गुंतवणूकदारांना परतावा द्यावा म्हणून सेबीने देशभरातील पॅनकार्ड क्लबची जंगम मालमत्ता जप्त करून लिलाव केला. त्यातून आतापर्यंत ७००० कोटींची वसुली करण्यात आली. आता रक्कम मिळणार असल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्यात. पण वसुलीपेक्षा जास्त रक्कम परताव्यासाठी हवी असल्याने सेबीने कारवाई थांबविली. सेबीने २३ जानेवारी १८ रोजी याबाबत सुनावणी केली. दरम्यान, पॅनकार्ड क्लबच्या सीएमडीची संपत्ती फेब्रुवारीत जप्त केली जाणार होती. दरम्यान, गुंतवणूकदारांनी संतुलन गमाविल्याने २६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी मोर्चा सेबीवर काढला गेला. सेबीची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप होत असून, गुंतवणूकदारांना रक्कम मिळण्याची आशा धुसर झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाEconomyअर्थव्यवस्था