शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेज कुणाच्या फायद्याचे, सावकार की शेतकरी?

By admin | Updated: December 18, 2014 00:49 IST

विरोधकही संभ्रमात, मुख्यमंत्र्यांनाच मागितले स्पष्टीकरण.

विवेक चांदूरकर/नागपूर: शासनाने दुष्काळ निवारण्यासाठी सात हजार कोटी रूपयांचे पॅकेज घोषित केले आहे. या पॅकेजमध्ये राज्यातील पाच लाख शेतकर्‍यांचे सावकारांकडील कर्ज माफ करण्यात आले. शासनाने शेतकर्‍यांना सरळ मदत देण्याऐवजी सावकारांकडील कर्ज माफ का केले, हे पॅकेज शेतकर्‍यांसाठी आहे की सावकारांसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पॅकेजला विरोधी पक्षातील आमदारांनी विरोध दर्शवित कर्ज कसे माफ करणार व त्याचे निकष काय असणार, असा प्रश्न सरळ मुख्यमंत्र्यांना विचारला. अधिवेशनात पहिल्या आठवड्यात राज्यातील दुष्काळावर चर्चा झाल्यानंतर दुसर्‍या आठवड्यात कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात झालेल्या गारपिटीवर सभागृह गाजविण्यात येत आहे. शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये कर्जमाफीचा फायदा शेतकर्‍यांना मिळणार की सावकारांना, असा प्रश्न विरोधकांनी दोन्ही सभागृहात विचारला. मुंब्रा- कळवाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी सावकाराकडून कर्ज घेताना कोणती कागदपत्रे देणे आवश्यक आहे, सावकारी कायद्यातील तरतूद काय आहे, तसेच हे पॅकेज कुणासाठी घोषित करण्यात आली आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांना मागितली. अमरावती विभागाचे विधान परिषदेचे आमदार ख्वाजा बेग यांनीही परिषदेत पॅकेजवर नाराजी दर्शवित याचा लाभ सावकारांनाच मिळणार असल्याचे सांगितले. वर्‍हाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील तीन्ही जिल्ह्यात पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्यामुळे दुष्काळ घोषित होईल व शेतकर्‍यांना लाभ मिळेल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती; मात्र सरळ शेतकर्‍यांना मदत देण्याऐवजी शासनाने शेतकर्‍यांचे सावकारांकडीले कर्ज माफ केले. राज्यात असे पाच लाख शेतकरी असल्याचे शासनाचे म्हणणे आहे; मात्र सावकार शेतात पेरणीसाठी किंवा उत्पादन घेण्यासाठी कर्ज देतच नाहीत. शेतकर्‍याने गहाण ठेवलेल्या रकमेच्या साठ ते सत्तर टक्केच सावकार कर्ज देतो, त्यावेळी तो कर्ज कशासाठी हवे, याचा विचार करीत नाही. दुसरीकडे आता प्रत्येक बँक शेतकर्‍यांना सहज पीक कर्ज देते. त्यामुळे सावकारांची संख्याही आता कमी झाली असून, १८ लाख लोकसंख्या व एक हजार नऊ गावे असलेल्या अकोला जिल्ह्यात केवळ १९६ परवानाधारक सावकार आहेत. त्यांच्याकडून ९१ हजारांनी कर्ज घेतले आहेत; मात्र यापैकी प्रत्यक्ष शेतकरी किती, हा संशोधनाचा विषय आहे. * गैरप्रकाराची शक्यता अधिक शेतकर्‍यांचे सावकारांकडील कर्ज माफ करण्यात आल्याची घोषणा शासनाने केली. शेतकर्‍याने सावकाराकडून कर्ज घेतल्याचे रेकॉर्ड चोख असल्याची शक्यता कमीच आहे. किती शेतकर्‍यांनी सावकारांकडून किती कर्ज घेतले, याची निश्‍चित माहिती मिळणे कठीण आहे. त्यामुळे कर्ज माफ झाल्याची घोषणा होताच परवानाधारक सावकार शेतकर्‍यांशी संधान साधून खोटे कागदपत्र तयार करू शकतात. पैशांच्या वाटणीच्या अटीवर शेतकरीही तयार होतील, त्यामुळे यामध्ये गैरप्रकारच अधिक होण्याची शक्यता आहे.