शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मेथीची गड्डी केवळ ३ रुपयात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:14 IST

- रवी दामोदर अकोला : ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्याची जणू परंपराच आहे. तरीही शेतकरी स्वत:चा जीव धोक्यात ...

- रवी दामोदर

अकोला : ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्याची जणू परंपराच आहे. तरीही शेतकरी स्वत:चा जीव धोक्यात घालून पिकाच्या रक्षणासाठी जीवाचे रान करतो. बाळापूर तालुक्यातील टाकळी खुरेशी येथील अल्पभूधारक शेतकरी आशीष वरखडे यांनी रात्रीचा दिवस करीत मेथीचे पीक घेतले; मात्र बाजारात आवक वाढल्याचे कारण दाखवून मेथीचे भाव गडगडले आहेत. मेथीची गड्डी केवळ ३ ते ५ रुपयांना विकल्या जात असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. कर्जाचा डोंगर उभारून पिकाची पेरणी केली, भाव मिळत नसल्याने खर्चही निघत नाही, हे लक्षात आल्यानंतर कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यास पडला आहे.

रात्रंदिवस कष्ट करून पिकाला जपले जाते. जीवाचे रान करून पिकाचे उत्पादन घेतले जाते; पण पिकाला भाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. यंदा अतिपावसामुळे परिसरातील खरीप हंगामाची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. कर्जाचा डोंगर उभारून शेतकऱ्यांनी पुन्हा रब्बीची तयारी केली. तसेच अतिपावसामुळे कूपनलिका व विहिरांना पाणी मुबलक असल्याने शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळले आहेत; मात्र शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे.

यंदा मुबलक पाणी असल्याने टाकळी खुरेशी येथील शेतकरी आशीष वारखेडे यांनी मेथीची पेरणी केली. रात्रंदिवस कष्ट करीत उत्पादन घेतले; मात्र बाजारपेठेत मेथीची आवक वाढल्याने ठोक बाजारपेठेत मेथीचा मन केवळ ५० ते ६० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. मेथीच्या ३ गड्ड्या केवळ १० रुपयांमध्ये विक्री होत शेतकऱ्यांचा लागवडी खर्चही निघत नाही.

——————

पिकाच्या रक्षणासाठी जीवाचे रान!

परिसरात कृषी पंपांना रात्रीचा वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी रात्री स्वत:चा जीव धोक्यात घालून कुडकुडत्या थंडीत पाणी देण्यासाठी शेतात जात आहे. पिकाच्या रक्षणासाठी जीवाचे रान करीत आहे; मात्र भाव घसरल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

----------------------------

यंदा बोअरला मुबलक पाणी असल्याने मेथीची पेरणी केली; मात्र बाजारात भाव मिळत नसल्याने खर्चही निघत नाही.

- आशीष वरखेडे, शेतकरी, टाकळी खुरेशी, ता. बाळापूर.