शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पश्‍चिम वर्‍हाडात दोन हजारांवर सौर कृषी पंप कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 02:41 IST

अकोला : शेतकर्‍यांना अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महावितरणच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेल्या अटल सौर ऊर्जा कृषी पंप योजनेंतर्गत पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये जानेवारी, २0१८ अखेरपर्यंत २0९७ सौर ऊर्जा पंप कार्यान्वित झाले आहेत. तीन जिल्हय़ांसाठी सौर पंपांचे एकूण सुधारित उद्दिष्ट २६00 आहे. सध्या ही योजना गुंडाळण्यात आली असली, तरी उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत या योजनेंतर्गत सौर पंपांचे वाटप सुरू आहे.

ठळक मुद्देयोजना गुंडाळली, तरी पंपांचे वाटप सुरू तीन जिल्हय़ांसाठी २६00 पंपांचे उद्दिष्ट

अतुल जयस्वाल । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांना अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महावितरणच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेल्या अटल सौर ऊर्जा कृषी पंप योजनेंतर्गत पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये जानेवारी, २0१८ अखेरपर्यंत २0९७ सौर ऊर्जा पंप कार्यान्वित झाले आहेत. तीन जिल्हय़ांसाठी सौर पंपांचे एकूण सुधारित उद्दिष्ट २६00 आहे. सध्या ही योजना गुंडाळण्यात आली असली, तरी उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत या योजनेंतर्गत सौर पंपांचे वाटप सुरू आहे.पारंपरिक वीजनिर्मितीकरिता असलेल्या र्मयादा आणि वाढती मागणी, यामुळे वीज भारनियमन केले जाते. शेतकर्‍यांच्या कृषी पंपाला पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. विहिरींना पाणी असूनही केवळ विजेअभावी सिंचनात अडथळे येतात. यावर तोडगा म्हणून शेतकर्‍यांना अनुदानावर सौर कृषी पंप वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली. यामध्ये लाभार्थी शेतकर्‍यांना ७.५ अश्‍वशक्तीपासून ते तीन अश्‍वशक्ती क्षमतेचा सौर उज्रेवर चालणारा कृषी पंप देण्यात येतो. दहा एकरांपर्यंत शेती असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी लाभार्थी हिस्सा म्हणून शेतकर्‍याला केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. केंद्र सरकार ३0 टक्के, तर राज्य सरकार पाच टक्के अनुदान देते. योजना सुरू झाली त्यावेळी अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्हय़ांसाठी ३९६0 पंपांचे उद्दिष्ट होते. त्यानंतर हे उद्दिष्ट २६00 पर्यंत घटविण्यात आले. दरम्यान, केंद्र सरकारची ही योजना बंद करण्यात आली. तथापि, योजना बंद होण्यापूर्वी अर्ज केलेल्या शेतकर्‍यांना सौर पंप कार्यान्वित करून देण्याचे काम सुरूच आहे. ३१ जानेवारी २0१८ पर्यंत अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ातील ४,८४५ शेतकर्‍यांनी या योजनेसाठी अर्ज भरले. यापैकी ४,२५७ शेतकर्‍यांचे अर्ज मंजूर झाले असून, त्यापैकी ४,१९४ शेतकर्‍यांनी कोटेशन भरले आहे. यापैकी २,३२५ शेतकर्‍यांनी लाभार्थी हिस्सा भरला आहे. या योजनेंतर्गत अकोला जिल्हय़ात ५५७, बुलडाणा जिल्हय़ात ७६२, तर वाशिम जिल्हय़ात ७७८ अशा एकूण २,0९७ शेतकर्‍यांच्या शेतात सौर कृषी पंप कार्यान्वित झाले आहेत.

नव्या निकषांसह सुरू होणार योजना?केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरून सौर पंप मिळत असल्याने अटल सौर कृषी पंप योजना लोकप्रिय झाली होती. शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी असलेली ही योजना अध्र्यावरच गुंडाळण्यात आल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारची असलेली ही योजना पुन्हा नव्या निकषांसह सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांकडून मिळाली आहे. ही योजना नव्याने राबविण्यासाठी मंत्रिमंडळ स्तरावर हालचाली सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहर