शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कपाशीवर तुडतुडे आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 10:26 IST

कपाशीच्या पानांच्या कडा पिवळसर होऊन ते लालसर पडत असल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडले आहेत.

अकोला: गत दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेला तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर तुडतुड्यांसह फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कपाशीच्या पानांच्या कडा पिवळसर होऊन ते लालसर पडत असल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडले आहेत.जिल्ह्यात काही ठिकाणी कपाशीवर तुडतुड्यांसह फुलकिड्यांचादेखील प्रादुर्भाव वाढत आहे. फुलकिड्यांचे प्रौढ आणि पिल्ले पानांच्या शिरेजवळ राहून पानातील रस शोषून घेत आहेत. फुलकिड्यांनी रखडलेल्या भागावर पांढुरके चट्टे दिसून येत आहेत. प्रादुर्भावग्रस्त भागातील कपाशीच्या पानांच्या पेशी शुष्क होत असून, जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या भागात कपाशीच्या पानांचा रंग लाल होत आहे. पात्या आणि बोंडावरही प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. यावर अंकुश लावण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना व्यवस्थापनासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.असे करावे व्यवस्थापन

  • नत्र खताचा वापर शिफारशीनुसारच करावा. अवास्तव वापर टाळावा.
  • पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडीराक्टीन १५०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडीराक्टीन ३००० पीपीएम ४० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • आठवड्यातून किमान एक वेळा पिकाचे सर्वेक्षण करावे.
  • किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्यासच (२ तुडतुडे प्रती पान, १० फुलकिडे प्रती पान) रासायनिक व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

त्याकरिता प्राफेनोफॉस ५० इसी मिली (एकरी ४०० मिली) किंवा बुप्रोफेझीन २५ एस सी २० मिली (एकरी ४०० मिली) किंवा प्लोनिकअमीड ५० डब्ल्यू डी जी ४ ग्राम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.जिल्ह्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर तुडतुड्यांसह फुलअडीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी शेतकºयांनी योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे.- डॉ. चारुदत्त ठिपसे, कृषी विज्ञान केंद्र,अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोला