शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कपाशीवर तुडतुडे आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 10:26 IST

कपाशीच्या पानांच्या कडा पिवळसर होऊन ते लालसर पडत असल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडले आहेत.

अकोला: गत दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेला तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर तुडतुड्यांसह फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कपाशीच्या पानांच्या कडा पिवळसर होऊन ते लालसर पडत असल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडले आहेत.जिल्ह्यात काही ठिकाणी कपाशीवर तुडतुड्यांसह फुलकिड्यांचादेखील प्रादुर्भाव वाढत आहे. फुलकिड्यांचे प्रौढ आणि पिल्ले पानांच्या शिरेजवळ राहून पानातील रस शोषून घेत आहेत. फुलकिड्यांनी रखडलेल्या भागावर पांढुरके चट्टे दिसून येत आहेत. प्रादुर्भावग्रस्त भागातील कपाशीच्या पानांच्या पेशी शुष्क होत असून, जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या भागात कपाशीच्या पानांचा रंग लाल होत आहे. पात्या आणि बोंडावरही प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. यावर अंकुश लावण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना व्यवस्थापनासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.असे करावे व्यवस्थापन

  • नत्र खताचा वापर शिफारशीनुसारच करावा. अवास्तव वापर टाळावा.
  • पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडीराक्टीन १५०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडीराक्टीन ३००० पीपीएम ४० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • आठवड्यातून किमान एक वेळा पिकाचे सर्वेक्षण करावे.
  • किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्यासच (२ तुडतुडे प्रती पान, १० फुलकिडे प्रती पान) रासायनिक व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

त्याकरिता प्राफेनोफॉस ५० इसी मिली (एकरी ४०० मिली) किंवा बुप्रोफेझीन २५ एस सी २० मिली (एकरी ४०० मिली) किंवा प्लोनिकअमीड ५० डब्ल्यू डी जी ४ ग्राम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.जिल्ह्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर तुडतुड्यांसह फुलअडीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी शेतकºयांनी योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे.- डॉ. चारुदत्त ठिपसे, कृषी विज्ञान केंद्र,अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोला