शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
3
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
4
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
5
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
6
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
7
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
8
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
9
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
10
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
12
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
13
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
14
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
15
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
16
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
17
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
18
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
19
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
20
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी पीक नुकसानीचे अर्ज केवळ २२ हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:18 IST

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला असतानाच, प्रधानमंत्री पीक ...

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला असतानाच, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेल्या १ लाख ९० हजार ५२४ शेतकऱ्यांपैकी शनिवारपर्यंत केवळ २२ हजार ९२९ शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे तक्रार अर्ज पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. त्यामुळे पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके पाण्यात बुडाल्याने, शेतकरी संकटात सापडला. दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात विहीत मुदतीत जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ५२४ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. पीक विम्याच्या लाभासाठी पिकांचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या मुदतीत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानाची सूचना किंवा तक्रार अर्ज संबंधित विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर विमा कंपनी, कृषी विभाग व महसूल विभागामार्फत जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीसंदर्भात अर्ज घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१ जुलैपर्यंत केवळ २२ हजार ९२९ शेतकऱ्यांचे पीक नुकसानाचे अर्ज पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विमा काढलेले शेतकरी आणि पीक

नुकसानीच्या अर्जांची अशी आहे संख्या!

तालुका शेतकरी अर्ज

अकोला ४२०८४ ८७१०

बार्शीटाकळी २०२७३ ३१८५

मूर्तिजापूर ३१२६३ २२८९

अकोट ३०४७४ ८००

तेल्हारा २००८४ १७४२

बाळापूर ३२८५२ ५३७३

पातूर १३५३४ ३०

.........................................................................

एकूण १९०५२४ २२९२९

प्राथमिक अहवालानुसार ७५ हजार

हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पंचनामे सुरू!

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत सुरू आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोत यांनी सांगितले.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीसंदर्भात सूचना अर्ज विमा कंपनी, कृषी विभाग व महसूल विभागामार्फत स्वीकारण्यात आले. विमा काढलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २२ हजार ९२९ शेतकऱ्यांचे सूचना अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधित विमा कंपनीकडे सादर करण्यात आले.

-संजय खडसे,

निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.