शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘आमचं गाव, आमचा विकास’ आराखडा पुन्हा तयार होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:54 IST

पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा व २०२०-२१ चा वार्षिक आराखडा निश्चित करण्याची तयारी राज्य स्तरावर सुरू झाली आहे.

अकोला : राज्यात गेल्या तीन वर्षांत राबविण्यात आलेल्या आमचं गाव, आमचा विकास, उपक्रमानंतर येत्या २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा व २०२०-२१ चा वार्षिक आराखडा निश्चित करण्याची तयारी राज्य स्तरावर सुरू झाली आहे. त्यासाठी २ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत ग्रामसभा घेऊन त्यामध्ये आराखडा निश्चित केला जाणार आहे. आराखड्यांचा अहवाल ३१ जानेवारी २०२० पर्यंत शासनाकडे सादर करावा लागणार आहे.यापूर्वी चार वर्षांचा विकास आराखडा निश्चित झाला होता. त्यापैकी झालेली कामे वगळून नवा आराखडा तयार करावा लागणार आहे. गेल्या आराखड्यातील शिल्लक कामे, गावाच्या आणखी गरजा, आवश्यकता, गावकऱ्यांचे पुढील नियोजन विचारात घेऊन ग्रामसभेमार्फत कामांचा प्राधान्यक्रम ठरणार आहे. त्यासाठी गावातील विविध घटकांशी विचारविनिमय करणे, त्यांच्या गरजा, मागण्या विचारात घेऊन कामे, उपक्रमांचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल. पुढील पाच वर्षांत ग्रामपंचायतींना प्राप्त होणाºया निधीच्या दुप्पट रकमेची कामे आराखड्यात समाविष्ट केली जातील.- अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभाग्रामसभेत आराखडा तयार करण्यासाठी पंचायत समितीच्या प्रत्येक गणातील गावांची जबाबदारी विस्तार अधिकाºयांवर दिली जाईल. गावातील महिला, युवती, युवक, आर्थिक व सामाजिक कमकुवत घटकांना समाविष्ट करण्यासाठी प्रत्येक गणात एका मुख्य सेविकेचीही निवड करून प्रशिक्षण दिले जाईल.- ग्रामसभेत द्यावी लागणार संपूर्ण माहिती!ग्रामसभेत ग्रामपंचायतने आतापर्यंत हाती घेतलेले उपक्रम, कामे, त्यावर झालेला खर्च, शिल्लक निधी, पुढील पाच वर्षांत मिळणारे उत्पन्न, इतर निधीची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. सोबतच यापूर्वी ग्रामपंचायतने ठरविलेला कामांचा प्राधान्यक्रम, गावाच्या गरजा, अडचणी, त्यावरील उपाययोजनांची अंमलबजावणीही सांगितली जाईल.- ग्रामसभेच्या पूर्वी तीन सभाग्रामपंचायतींमध्ये मुख्य ग्रामसभेच्या आधीच्या दिवशी महिला सभा, मागासवर्गीय व वंचित घटकांची सभा, बालसभा अशा तीन सभा घ्याव्या लागतील. त्या तिन्ही सभांतील चर्चा व शिफारशी याबाबत ग्रामपंचायतने आराखडा निश्चित करण्यासाठी ग्रामसभेत चर्चा होईल. बालसभेत गावातील सर्व मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, १८ वर्षांपर्यंतच्या मुले-मुली उपस्थित राहतील.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायतgovernment schemeसरकारी योजना