शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या मागासपणाचे मूळ शेतकरीविरोधी कायद्यात - अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 02:01 IST

सिलिंग, जमीन अधिग्रहण आणि  आवश्यक वस्तू कायदा हे शेतकर्‍यांचे गळफास ठरले आहेत. ते रद्द  झाल्याशिवाय शेतकरी बंधमुक्त होणार नाही, शेतीच्या मागासपणाचे मूळ या शे तकरीविरोधी कायद्यांमध्येच असल्याचा घणाघाती आरोप  शेतकरी नेते,  अभ्यासक अमर हबीब यांनी केला. 

ठळक मुद्देशेतकरीविरोधी कायद्यांचा अकोटात जागर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : भारतीय संविधानात शेतकरीविरोधी कायदे घुसवून राज्यकर्त्यांनी  गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्‍यांचे शोषण चालविले आहे. मूळ संविधानात  परिशिष्ट नऊ घुसवून शेतकर्‍यांना न्यायालयाचे दरवाजे बंद करण्याचे काम त त्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी केले. सिलिंग, जमीन अधिग्रहण आणि  आवश्यक वस्तू कायदा हे शेतकर्‍यांचे गळफास ठरले आहेत. ते रद्द  झाल्याशिवाय शेतकरी बंधमुक्त होणार नाही, शेतीच्या मागासपणाचे मूळ या शे तकरीविरोधी कायद्यांमध्येच असल्याचा घणाघाती आरोप  शेतकरी नेते,  अभ्यासक अमर हबीब यांनी केला. ‘लोकजागर मंच’च्या वतीने ‘शेतकर्‍यांचा गळफास ठरलेले कायदे’ या  विषयावर जाहीर भाषणाचे आयोजन ३ डिसेंबर रोजी अकोटात करण्यात आले  होते. यावेळी ते बोलत होते.  खा. संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार  पडलेल्या या कार्यक्रमाला लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे, शेतकरी  नेते ललित बहाळे, पुरुषोत्तम आवारे पाटील, अँड. सुधाकर खुमकर, गजानन  बोरोकार, जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब  आवारे प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.अमर हबीब यांचे भाषण ऐकण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या शेतकर्‍यांनी  अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह खचाखच भरलेले होते. आपल्या  जवळपास तासाभराच्या भाषणाने हबीब यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. सरकारी  नोकरीतील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याला किमान १८ हजार रुपये मासिक वेतन  मिळायला हवे, अशी शिफारस सातव्या वेतन आयोगातील तरतुदीत करतात.  मग शेतकर्‍याचे काय, असा सवाल उपस्थित करून शेतकर्‍यांच्या हातात  किमान वर्षाला सव्वादोन लाख रुपये पडायला हवेत, असे हबीब म्हणाले.  कोणताही व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकाने किती दुकाने थाटावित, याला  काही बंधन नाही. एखाद्या डॉक्टरने, वकिलाने किती व्यवसाय करायचा  यावरही बंधन नाही. मग शेतकर्‍यांना ५४ एकराचे बंधन का, असा सवाल उ पस्थित करून त्यांनी सिलिंग कायद्याची खिल्ली उडविली. एकदा कर्जमाफीची  घोषणा केल्यानंतर त्यात वेळोवेळी दुरुस्त्या करणार्‍या मुख्यमंत्र्यांचीही त्यांनी  टर उडविली. सिलिंग कायद्याप्रमाणेच आवश्यक वस्तूंचा कायदा शे तकर्‍यांसाठी कसा जीवघेणा आहे, हे हबीब यांनी सोदाहरण स्पष्ट केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकजागर मंचचे सरचिटणीस पुरुषोत्तम अवारे पाटील  यांनी केले.  लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी मंचाची भूमिका  मांडली.  या कार्यक्रमातच पुरुषोत्तम अवारे आणि अनिल गावंडे यांनी संपादित  केलेल्या ‘कायदे जेव्हा जीवघेणे ठरतात’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. संचालन लोकजागर मंचचे कार्याध्यक्ष अँड. सुधाकर  खुमकर यांनी केले, तर अनंतराव सपकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.  -

टॅग्स :Akola cityअकोला शहर