शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:16 IST

अकोला: शेतकऱ्यालाा त्याचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी अकोला जिल्ह्यात एप्रिल २०१८ पर्यंत कमीत कमी दहा हजार शेततळे पुर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आले असून, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी या योजनेतंर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे सर्वाधिक शेततळे तयार करणाऱ्या ग्रामपंचायतीला ५ लाखांचे पारितोषिकदुसरे पारितोषिक दोन लाख रुपये व तिसरे पारितोषिक एक लाख रुपये देण्यात येईल.जे शेतकरी स्वत: सहभागी होउन शेततळे पुर्ण करतील, त्या शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात येईल.

अकोला: महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहु क्षेत्रातील पुर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यावर तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. हीच बाब लक्षात घेउन मुख्यमंत्री व जलसंधारण व रोहयो मंत्री यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू केलेली आहे. शेतकऱ्यालाा त्याचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी अकोला जिल्ह्यात एप्रिल २०१८ पर्यंत कमीत कमी दहा हजार शेततळे पुर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आले असून, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी या योजनेतंर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेततळ्याचा लाभ घेणारे शेतकरी व जास्तीत जास्त शेततळे तयार करणाऱ्या ग्रामपंचायतीचा गौरव केला जाणार आहे, असे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले आहे.सदर योजनेमध्ये ३० एप्रिल २०१८ पर्यंत जे शेतकरी स्वत: सहभागी होउन शेततळे पुर्ण करतील, त्या शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात येईल. तसेच या योजनेतून १ मे २०१८ पर्यंत ज्या गावांत जास्त शेततळे होतील, त्या ग्राम पंचायतीला जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधुन प्रथम पारितोषिक म्हणून पाच लाख रुपये, तर दुसरे पारितोषिक दोन लाख रुपये व तिसरे पारितोषिक एक लाख रुपये देण्यात येईल.स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता संबंधित उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क करावा. तसेच सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता शेवटची तारिख दिनांक ३० जानेवारी २०१८ ही आहे. स्पर्धे मध्ये सहभागी होणाऱ्या ग्राम पंचायतीला गाव हागणदारी मुक्त करणे, गावातील शाळा डिजीटल करणे, शेततळयाची कामे जास्तीत जास्त लोक सहभागातून करणे आवश्यक आहे.सदर स्पधेर्चा निकाल हा दिनांक १ मे २०१८ रोजी घोषित करण्यात येईल. तसेच या कामामध्ये जे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी होउन जास्तीत जास्त शेततळयाची कामे पुर्ण करून घेतील त्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या दिनांक १ मे २०१८ रोजी पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात येईल असे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेती