शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

 बोगस बियाणे प्रकरणी हलगर्जी केल्यास कारवाई करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 16:05 IST

अकोला : बियाणे, खत, कीटकनाशकांचे नमुने तपासणीत बोगस आढळून आल्यास ठरलेल्या मुदतीत प्रकरण न्यायालयात दाखल न करणाऱ्या बियाणे निरीक्षकांसह संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश कृषी आयुक्तांनी दिला आहे.

अकोला : बियाणे, खत, कीटकनाशकांचे नमुने तपासणीत बोगस आढळून आल्यास ठरलेल्या मुदतीत प्रकरण न्यायालयात दाखल न करणाऱ्या बियाणे निरीक्षकांसह संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश कृषी आयुक्तांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठात दाखल प्रकरणात बियाणे निरीक्षकाला दंड झाल्याने कृषी विभाग आता ताळ्यावर आला आहे.हंगामात बियाणे कंपन्यांकडून बोगस बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. हा प्रकार रोखण्यासाठी पेरणीपूर्वी किंवा त्यानंतर बियाणे नमुने तपासणी केली जाते. त्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये ते अप्रमाणित (बोगस) आढळून येतात. प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही बियाणे निरीक्षकांनी कंपन्यांशी हातमिळवणी करून पुढील कारवाईस फाटा दिल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे, ही बाब थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोरच उघड झाली.सोयाबीन बियाण्यांचा नमुना अप्रमाणित असताना संबंधित बियाणे निरीक्षकाने प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात कमालीची दिरंगाई केली. ही बाब उघड झाल्याने न्यायालयाने बियाणे निरीक्षकांच्या कामकाजाचे वाभाडे काढले. प्रकरणही खारीज केले. निरीक्षकाला २० हजार रुपये दंड करून तो अर्जदारास देण्याचा आदेशही प्रकरण क्रमांक १११०-२०१८ मध्ये दिला. न्यायालयाच्या ताशेऱ्यांमुळे अडचणीत आलेला कृषी विभाग आता ताळ्यावर आला आहे. कोणत्याही कंपनीच्या बियाण्यांचे, खत, कीटकनाशकांचे नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल प्राप्त होताच न्यायालयात प्रकरण दाखल करणे बंधनकारक आहे. बियाणे निरीक्षकाने कायद्यातील मुदतीत प्रकरण दाखल न केल्यास संबंधित निरीक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा आदेश राज्याच्या कृषी आयुक्तांनी दिल्यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी दिला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र