शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

सौर ऊर्जा प्रकल्पाला ग्राम विकास समितीचा विरोध

By admin | Updated: July 15, 2017 01:18 IST

मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: पारस येथील विस्तारित प्रकल्पासासाठी १२५ एकर जमीन शासनाने गेल्या ७ ते ८ वर्षांपासून संपादित केली आहे. शेती संपादित करताना औष्णिक वीज निर्मिती केंद्र होणार असल्याचे सांगण्यात आले होते, आता सौर ऊर्जा प्रकल्प होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याला आमचा तीव्र विरोध राहील, तसेच प्रकल्प होणार नसेल तर संपादित केलेली जमीन परत करा, अशी मागणी पारस ग्राम विकास संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. पारस येथे वीज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी १२५ एकर जमीन स्वखुशीने दिली होती. त्यावेळी औष्णिक वीज केंद्राची निर्मिती करू असे, महाजेनको कंपनीच्या वतीने सांगण्यात आले होते; परंतु आता या जागेवर सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारण्याचा घाट घातल्या जात आहे. या प्रकल्पामुळे बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही व बेकारीचे प्रमाण वाढणार आहे. शासनाने परळी येथे विस्तारित संच दिला आहे. भुसावळ येथे विस्तारीत ६८० मे. वॅटचा संच दिला. परळी येथे आधीच पाण्याअभावी वीज निर्मिती बंद करावी लागते. तेथील वीज निर्मितीचा खर्चही जास्त आहे. अशा परिस्थितीत पारस येथे जमीन व इतर सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने शासनाला विस्तारित प्रकल्प देणे सोयीचे जाणार आहे. तसेच परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळेल. आमची शेती औष्णिक वीज निर्मीती केद्रांकरिता संपादित केल्यामुळे पारसला औष्णिकच प्रकल्प द्यावा, सौर ऊर्जेचा प्रकल्प देऊ नये, दिल्यास व्यापक स्वरूपात आंदोलन करण्यात येणार, असा इशारा पारस ग्राम विकास संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. सौर ऊर्जेचा प्रकल्प दिल्यास ती शेतकऱ्यांची फसवणूक केल्यासारखे होईल, तसेच प्रकल्प होत नसल्यास संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष ललीत खंडारे यांनी निवेदनात केली आली आहे. निवेदनाच्या प्रती पारस प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यासह इतरांना देण्यात आल्या आहेत.