शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

सौर ऊर्जा प्रकल्पाला ग्राम विकास समितीचा विरोध

By admin | Updated: July 15, 2017 01:18 IST

मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: पारस येथील विस्तारित प्रकल्पासासाठी १२५ एकर जमीन शासनाने गेल्या ७ ते ८ वर्षांपासून संपादित केली आहे. शेती संपादित करताना औष्णिक वीज निर्मिती केंद्र होणार असल्याचे सांगण्यात आले होते, आता सौर ऊर्जा प्रकल्प होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याला आमचा तीव्र विरोध राहील, तसेच प्रकल्प होणार नसेल तर संपादित केलेली जमीन परत करा, अशी मागणी पारस ग्राम विकास संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. पारस येथे वीज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी १२५ एकर जमीन स्वखुशीने दिली होती. त्यावेळी औष्णिक वीज केंद्राची निर्मिती करू असे, महाजेनको कंपनीच्या वतीने सांगण्यात आले होते; परंतु आता या जागेवर सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारण्याचा घाट घातल्या जात आहे. या प्रकल्पामुळे बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही व बेकारीचे प्रमाण वाढणार आहे. शासनाने परळी येथे विस्तारित संच दिला आहे. भुसावळ येथे विस्तारीत ६८० मे. वॅटचा संच दिला. परळी येथे आधीच पाण्याअभावी वीज निर्मिती बंद करावी लागते. तेथील वीज निर्मितीचा खर्चही जास्त आहे. अशा परिस्थितीत पारस येथे जमीन व इतर सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने शासनाला विस्तारित प्रकल्प देणे सोयीचे जाणार आहे. तसेच परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळेल. आमची शेती औष्णिक वीज निर्मीती केद्रांकरिता संपादित केल्यामुळे पारसला औष्णिकच प्रकल्प द्यावा, सौर ऊर्जेचा प्रकल्प देऊ नये, दिल्यास व्यापक स्वरूपात आंदोलन करण्यात येणार, असा इशारा पारस ग्राम विकास संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. सौर ऊर्जेचा प्रकल्प दिल्यास ती शेतकऱ्यांची फसवणूक केल्यासारखे होईल, तसेच प्रकल्प होत नसल्यास संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष ललीत खंडारे यांनी निवेदनात केली आली आहे. निवेदनाच्या प्रती पारस प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यासह इतरांना देण्यात आल्या आहेत.