शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महापालिका हद्दवाढीला विरोध !

By admin | Updated: March 10, 2016 02:32 IST

अकोला जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये ठराव मंजूर; शासनाकडे पाठविणार

अकोला: शहरातील समस्या लक्षात घेता, महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला तीव्र विरोध करीत, आधी शहराचा विकास करण्यात यावा, नंतरच शहराजवळील गावांचा शहरात समावेश करण्यात यावा, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी मंजूर करण्यात आला. स्थायी समितीचा हा ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती , पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रस्तावित मनपा हद्दवाढीला विरोध करीत, हद्दवाढीच्या विषयावर किमान एक वर्षानंतर शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी सदस्य विजय लव्हाळे यांनी सभेत केली, तसेच मनपा हद्दवाढीस विरोध नाही; मात्र आधी शहराचा विकास करण्यात यावा, त्यानंतरच हद्दवाढ करून शहराजवळील गावांचा मनपा क्षेत्रात समावेश करण्याची मागणी सदस्य दामोदर जगताप यांनी केली. मनपाच्या प्रस्तावित हद्दवाढमध्ये अकोला शहराजवळील २४ गावांचा मनपा क्षेत्रात समावेश होणार आहे; मात्र शहराची सध्या अवस्था बघता, पिण्याचे पाणी, रस्ते, प्रदूषण अशा अनेक समस्या आहेत. शहरातील समस्या काढून, आधी शहराचा विकास करण्यात यावा, त्यानंतर हद्दवाढ करून गावांचा मनपा क्षेत्रात समावेश करण्यात यावा, अशी मागणी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केली. मनपा हद्दवाढीस सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने, यासंबंधीचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. आधी शहराचा विकास करा, नंतरच हद्दवाढ करण्यात यावी, असा मंजूर करण्यात आलेला ठराव जिल्हाधिकारी व शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षांनी सांगितले.