शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सत्तेत असताना विरोधकांनी तिजोर्‍यांचे सिंचन केले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:54 IST

नांदुरा (बुलडाणा)/अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कम तरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, या प्रकल्पांचे कामही सुरू झाले; परंतु  मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोर्‍यांचे सिंचन  केले, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा घणाघात सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा (बुलडाणा)/अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कम तरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, या प्रकल्पांचे कामही सुरू झाले; परंतु  मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोर्‍यांचे सिंचन  केले, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूतल परिवहन तथा जलसंपदा मंत्री नितीन  गडकरी यांच्या हस्ते बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत  बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव  प्रकल्पासह नऊ सिंचन प्रकल्प तसेच  राष्ट्रीय महामार्गाच्या ११ कामांचा  तसेच अकोला  जिल्ह्यातील गांधीग्राम येथे ११ सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ रविवारी झाला. गांधीग्राम येथे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी  तब्बल २0 हजार कोटींची गरज होती. या निधीचा प्रस्ताव आम्ही पंतप्रधानांकडे दिल्यावर  नितीन गडकरी यांनी एका दिवसात त्याचा पाठपुरावा केला. म्हणून हा निधी उपलब्ध होऊ  शकला. येणार्‍या कालावधीत या निधीचा पूर्ण विनियोग करून, सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून   सिंचनाची व्यवस्था शेतकर्‍यांना दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंचन प्रकल्प पूर्ण  करण्याची इच्छाशक्ती विरोधकांमध्ये नव्हती, त्यांनी केवळ भ्रष्टाचार केला, असा आरोप  त्यांनी केला. यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर,  अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार  गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार बळीराम सिरस्कार, आ. हरीश पिंपळे,  आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल आदी उपस्थित होते. 

आभाळ फाटल्याची बोंब!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  नांदुरा येथील कार्यक्रमात  विरोधकांचा चांगलाच समाचार  घेतला. ज्यांनी आभाळाला भोकं पाडली तेच आज आभाळ फाटल्याची बोंब ठोकत आहे.  जिगाव प्रकल्पाला विलंब करुन पूर्वीच्या सरकारमधील अनेकांनी आपलं चांगभलं केलं,  असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रकल्पासाठी निधी कमी पडणार नाही : गडकरी सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून हरित क्रांती होईल. शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी दिले  जाईल. त्यामुळे हे प्रकल्प वेळत पूर्ण करा, निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. येणार्‍या काळात सिंचन प्रकल्पातून कालव्याद्वारे नव्हे, तर  जलवाहिनीद्वारे पाणी दिले जाईल. त्यामुळे पाण्याचा वापर तिपटीने वाढेल, असा दावा त्यांनी  केला.

कर्जमाफीमध्ये विदर्भाला ७ हजार ५00 कोटी काँग्रेसने सन २00८ मध्ये दिलेली   कर्जमाफी ही केवळ सहा हजार कोटींची होती व  त्यामध्ये विदर्भाला फक्त १५00 कोटी मिळाले. मात्र, भाजपा सरकारने दिलेल्या  कर्जमाफीमध्ये विदर्भातील शेतकर्‍यांना तब्बल ७ हजार ५00 कोटी दिले आहेत. शेवटच्या  शेतकर्‍यांचे कर्ज माफ होईपयर्ंत ही योजना सुरू राहील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी  केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbuldhanaबुलडाणाAkola cityअकोला शहर