शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सत्तेत असताना विरोधकांनी तिजोर्‍यांचे सिंचन केले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:54 IST

नांदुरा (बुलडाणा)/अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कम तरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, या प्रकल्पांचे कामही सुरू झाले; परंतु  मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोर्‍यांचे सिंचन  केले, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा घणाघात सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा (बुलडाणा)/अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कम तरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, या प्रकल्पांचे कामही सुरू झाले; परंतु  मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोर्‍यांचे सिंचन  केले, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूतल परिवहन तथा जलसंपदा मंत्री नितीन  गडकरी यांच्या हस्ते बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत  बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव  प्रकल्पासह नऊ सिंचन प्रकल्प तसेच  राष्ट्रीय महामार्गाच्या ११ कामांचा  तसेच अकोला  जिल्ह्यातील गांधीग्राम येथे ११ सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ रविवारी झाला. गांधीग्राम येथे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी  तब्बल २0 हजार कोटींची गरज होती. या निधीचा प्रस्ताव आम्ही पंतप्रधानांकडे दिल्यावर  नितीन गडकरी यांनी एका दिवसात त्याचा पाठपुरावा केला. म्हणून हा निधी उपलब्ध होऊ  शकला. येणार्‍या कालावधीत या निधीचा पूर्ण विनियोग करून, सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून   सिंचनाची व्यवस्था शेतकर्‍यांना दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंचन प्रकल्प पूर्ण  करण्याची इच्छाशक्ती विरोधकांमध्ये नव्हती, त्यांनी केवळ भ्रष्टाचार केला, असा आरोप  त्यांनी केला. यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर,  अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार  गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार बळीराम सिरस्कार, आ. हरीश पिंपळे,  आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल आदी उपस्थित होते. 

आभाळ फाटल्याची बोंब!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  नांदुरा येथील कार्यक्रमात  विरोधकांचा चांगलाच समाचार  घेतला. ज्यांनी आभाळाला भोकं पाडली तेच आज आभाळ फाटल्याची बोंब ठोकत आहे.  जिगाव प्रकल्पाला विलंब करुन पूर्वीच्या सरकारमधील अनेकांनी आपलं चांगभलं केलं,  असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रकल्पासाठी निधी कमी पडणार नाही : गडकरी सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून हरित क्रांती होईल. शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी दिले  जाईल. त्यामुळे हे प्रकल्प वेळत पूर्ण करा, निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. येणार्‍या काळात सिंचन प्रकल्पातून कालव्याद्वारे नव्हे, तर  जलवाहिनीद्वारे पाणी दिले जाईल. त्यामुळे पाण्याचा वापर तिपटीने वाढेल, असा दावा त्यांनी  केला.

कर्जमाफीमध्ये विदर्भाला ७ हजार ५00 कोटी काँग्रेसने सन २00८ मध्ये दिलेली   कर्जमाफी ही केवळ सहा हजार कोटींची होती व  त्यामध्ये विदर्भाला फक्त १५00 कोटी मिळाले. मात्र, भाजपा सरकारने दिलेल्या  कर्जमाफीमध्ये विदर्भातील शेतकर्‍यांना तब्बल ७ हजार ५00 कोटी दिले आहेत. शेवटच्या  शेतकर्‍यांचे कर्ज माफ होईपयर्ंत ही योजना सुरू राहील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी  केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbuldhanaबुलडाणाAkola cityअकोला शहर