शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

केवळ पावणेसात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By admin | Updated: December 16, 2014 01:08 IST

काटेपूर्णा धरणात फक्त ३१ टक्के उपयुक्त जलसाठा

अकोला : यंदा पाऊस कमी झाल्याने सिंचनासाठी पाणीच उपलब्ध झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनक्षेत्र घटले असून, रब्बी हंगामातील निर्मिती सिंचन क्षमतेच्या केवळ पावणेसात हजार हेक्टर क्षेत्रातच ओलित होऊ शकले.यंदा कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वांत मोठे काटेपूर्णा धरणात ५0 टक्क्य़ांच्या आत जलसंचय झाला. आजमितीस या सिंचन प्रकल्पात केवळ ३१ टक्क्य़ांच्या जवळपास उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. या एकट्या प्रकल्पाची सिंचनक्षमता साडेआठ हजार हेक्टर आहे. तथापि, पूरक पाणीच नसल्याने यंदा या प्रकल्पातील पाणी सिंचनाला सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम सिंचन प्रकल्पातील जलसाठा तर १0 टक्क्य़ांच्या आतच आल्याने या प्रकल्पातूनही यंदा सिंचनाला पाणी सोडले नाही. उर्वरित मोर्णा, निगरुणा आणि लघु पाटंबधारे प्रकल्पात जो काही जलसाठा संचयित झाला, त्या जलसाठय़ावर जिल्ह्यात ६,७२१ हेक्टर रब्बी हंगामातील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. काटेपूर्णा, उमा वगळता इतर सिंचन प्रकल्पांमध्ये जलसाठा उपलब्ध असल्याने त्यामधील पाणी जिल्ह्यातील जवळपास पावणेसात हजार हेक्टरवरील रब्बी हंगामातील पिकांना सोडण्यात आले असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.