शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

केवळ पावणेसात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By admin | Updated: December 16, 2014 01:08 IST

काटेपूर्णा धरणात फक्त ३१ टक्के उपयुक्त जलसाठा

अकोला : यंदा पाऊस कमी झाल्याने सिंचनासाठी पाणीच उपलब्ध झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनक्षेत्र घटले असून, रब्बी हंगामातील निर्मिती सिंचन क्षमतेच्या केवळ पावणेसात हजार हेक्टर क्षेत्रातच ओलित होऊ शकले.यंदा कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वांत मोठे काटेपूर्णा धरणात ५0 टक्क्य़ांच्या आत जलसंचय झाला. आजमितीस या सिंचन प्रकल्पात केवळ ३१ टक्क्य़ांच्या जवळपास उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. या एकट्या प्रकल्पाची सिंचनक्षमता साडेआठ हजार हेक्टर आहे. तथापि, पूरक पाणीच नसल्याने यंदा या प्रकल्पातील पाणी सिंचनाला सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम सिंचन प्रकल्पातील जलसाठा तर १0 टक्क्य़ांच्या आतच आल्याने या प्रकल्पातूनही यंदा सिंचनाला पाणी सोडले नाही. उर्वरित मोर्णा, निगरुणा आणि लघु पाटंबधारे प्रकल्पात जो काही जलसाठा संचयित झाला, त्या जलसाठय़ावर जिल्ह्यात ६,७२१ हेक्टर रब्बी हंगामातील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. काटेपूर्णा, उमा वगळता इतर सिंचन प्रकल्पांमध्ये जलसाठा उपलब्ध असल्याने त्यामधील पाणी जिल्ह्यातील जवळपास पावणेसात हजार हेक्टरवरील रब्बी हंगामातील पिकांना सोडण्यात आले असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.