शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

केवळ पावणेसात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By admin | Updated: December 16, 2014 01:08 IST

काटेपूर्णा धरणात फक्त ३१ टक्के उपयुक्त जलसाठा

अकोला : यंदा पाऊस कमी झाल्याने सिंचनासाठी पाणीच उपलब्ध झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनक्षेत्र घटले असून, रब्बी हंगामातील निर्मिती सिंचन क्षमतेच्या केवळ पावणेसात हजार हेक्टर क्षेत्रातच ओलित होऊ शकले.यंदा कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वांत मोठे काटेपूर्णा धरणात ५0 टक्क्य़ांच्या आत जलसंचय झाला. आजमितीस या सिंचन प्रकल्पात केवळ ३१ टक्क्य़ांच्या जवळपास उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. या एकट्या प्रकल्पाची सिंचनक्षमता साडेआठ हजार हेक्टर आहे. तथापि, पूरक पाणीच नसल्याने यंदा या प्रकल्पातील पाणी सिंचनाला सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम सिंचन प्रकल्पातील जलसाठा तर १0 टक्क्य़ांच्या आतच आल्याने या प्रकल्पातूनही यंदा सिंचनाला पाणी सोडले नाही. उर्वरित मोर्णा, निगरुणा आणि लघु पाटंबधारे प्रकल्पात जो काही जलसाठा संचयित झाला, त्या जलसाठय़ावर जिल्ह्यात ६,७२१ हेक्टर रब्बी हंगामातील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. काटेपूर्णा, उमा वगळता इतर सिंचन प्रकल्पांमध्ये जलसाठा उपलब्ध असल्याने त्यामधील पाणी जिल्ह्यातील जवळपास पावणेसात हजार हेक्टरवरील रब्बी हंगामातील पिकांना सोडण्यात आले असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.