शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घटना बदलविण्याची भाषा करणा-यांनाच बदलवून टाकू

By admin | Updated: April 25, 2016 02:04 IST

रामदास आठवले यांचा इशारा.

बुलडाणा: केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त देशभर कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांचा जयजयकार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे बाबासाहेबांचे पाईक आहेत. ते आरएसएसचे ऐकत नाहीत. बाबासाहेबांच्या संविधानावर त्यांचा विश्‍वास असून, ते घटनेप्रमाणे देश चालवित आहेत. तरीही घटना बदलविण्याची कोणी भाषा केल्यास आम्ही त्यालाच बदलवून टाकू, असा इशारा खा. रामदास आठवले यांनी दिला. जाती तोडो, भारत जोडो, समता अभियानाअंतर्गत खासदार आठवले यांनी काढलेली भारत भीम यात्रा रविवारी दुपारी बुलडाणा येथे दाखल झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खा. आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले काम करीत आहेत. इंदू मिलच्या जागेवर होणारे बाबासाहेबांचे भव्य स्मारक, महु येथील बाबासाहेबांचे निवासस्थान, याशिवाय बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेल्या इतर स्थळांचा विकास करण्याची भूमिका मोदींनी घेतली आहे. मागासवर्गीयांचे आरक्षण सुध्दा हे सरकार काढू शकत नाही. सरकारसंदर्भात वावड्या उठविल्या जात आहेत, त्यावर विश्‍वास ठेवू नका. जर कुणी संविधान बदलविण्याची भाषा करीत असेल तर त्याला सर्वप्रथम आर.पी. आय. रस्त्यावर उतरुन विरोध करेल, कारण आम्ही त्यांचे घटक पक्ष आहोत. सरकारची प्रत्येक भूमिका आम्हाला मान्य असेलच असे नाही. आमचे स्वतंत्र अस्तीत्व आहे. पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, प्रदेश कार्यध्यक्ष बाबुराव कदम, विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुधाकर तायडे, युथ रिपब्लीकनचे अध्यक्ष विजय साबळे, केशव सरकटे, जिल्हाध्यक्ष नरहरी गवई उपस्थित होते.विदर्भ राज्य व्हावे ही भाजपची भूमिका !विदर्भ राज्य वेगळे व्हावे, ही भाजपची सुरूवातीपासूनची भूमिका आहे. या भूमिकेला आरपीआयचासुध्दा पाठींबा आहे. कारण भाषावार प्रांतरचनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संमती होती. त्यामुळे वेगळा विदर्भ होईल असा विश्‍वास वाटतो. विदर्भ व मराठवाड्यावर कॉंग्रेसनेच अन्याय केला. विदर्भाच्या विकासाचे खरे मारक काँग्रेसवालेच आहेत, विदर्भातील गोसी खुर्द प्रकल्प अद्याप पुर्णत्वास गेला नाही. चंद्रपूर, गडचिरोलीपासून तर बुलडाण्यापर्यंतचे अनेक प्रकल्प व विकासाच्या योजना काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. हे प्रश्न मार्गी लागले असते तर आज वेगळ्या विदर्भाचा प्रश्न पुढे आलाच नसता. आता शिवसेना सोडली तर, सर्वच राजकिय पक्ष वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहेत. प्रकाश आंबेडकरांनाच नकोय ऐक्य !रिपाइंचे ऐक्य व्हावे ही प्रामाणिक भूमिका माझी नेहमीच राहीली आहे. एवढेच काय प्रकाश आंबेडकरांनीच या ऐक्याचे श्रेय घेऊन त्यांनीच प्रमुख बनावे, असेही मी वेळोवेळी बोललो आहे. मात्र मी ऐक्यासाठी बैठक बोलाविली की, प्रकाश आंबेडकर गैरहजर राहतात, अशी खंत खा. आठवले यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर आपणास का टाळतात? असे विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा मी ऐक्याची भूमिका घेतो, तेव्हा त्यांना असे वाटते की, शरद पवारांनीच आठवलेंना पुढे केले काय, त्यामुळे ते चर्चेत सहभागी होत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी १९९0 मध्ये ऐक्य कसे तुटले याचा किस्साही सांगीतला. प्रकाश आंबेडकर यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.