शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

घटना बदलविण्याची भाषा करणा-यांनाच बदलवून टाकू

By admin | Updated: April 25, 2016 02:04 IST

रामदास आठवले यांचा इशारा.

बुलडाणा: केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त देशभर कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांचा जयजयकार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे बाबासाहेबांचे पाईक आहेत. ते आरएसएसचे ऐकत नाहीत. बाबासाहेबांच्या संविधानावर त्यांचा विश्‍वास असून, ते घटनेप्रमाणे देश चालवित आहेत. तरीही घटना बदलविण्याची कोणी भाषा केल्यास आम्ही त्यालाच बदलवून टाकू, असा इशारा खा. रामदास आठवले यांनी दिला. जाती तोडो, भारत जोडो, समता अभियानाअंतर्गत खासदार आठवले यांनी काढलेली भारत भीम यात्रा रविवारी दुपारी बुलडाणा येथे दाखल झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खा. आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले काम करीत आहेत. इंदू मिलच्या जागेवर होणारे बाबासाहेबांचे भव्य स्मारक, महु येथील बाबासाहेबांचे निवासस्थान, याशिवाय बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेल्या इतर स्थळांचा विकास करण्याची भूमिका मोदींनी घेतली आहे. मागासवर्गीयांचे आरक्षण सुध्दा हे सरकार काढू शकत नाही. सरकारसंदर्भात वावड्या उठविल्या जात आहेत, त्यावर विश्‍वास ठेवू नका. जर कुणी संविधान बदलविण्याची भाषा करीत असेल तर त्याला सर्वप्रथम आर.पी. आय. रस्त्यावर उतरुन विरोध करेल, कारण आम्ही त्यांचे घटक पक्ष आहोत. सरकारची प्रत्येक भूमिका आम्हाला मान्य असेलच असे नाही. आमचे स्वतंत्र अस्तीत्व आहे. पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, प्रदेश कार्यध्यक्ष बाबुराव कदम, विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुधाकर तायडे, युथ रिपब्लीकनचे अध्यक्ष विजय साबळे, केशव सरकटे, जिल्हाध्यक्ष नरहरी गवई उपस्थित होते.विदर्भ राज्य व्हावे ही भाजपची भूमिका !विदर्भ राज्य वेगळे व्हावे, ही भाजपची सुरूवातीपासूनची भूमिका आहे. या भूमिकेला आरपीआयचासुध्दा पाठींबा आहे. कारण भाषावार प्रांतरचनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संमती होती. त्यामुळे वेगळा विदर्भ होईल असा विश्‍वास वाटतो. विदर्भ व मराठवाड्यावर कॉंग्रेसनेच अन्याय केला. विदर्भाच्या विकासाचे खरे मारक काँग्रेसवालेच आहेत, विदर्भातील गोसी खुर्द प्रकल्प अद्याप पुर्णत्वास गेला नाही. चंद्रपूर, गडचिरोलीपासून तर बुलडाण्यापर्यंतचे अनेक प्रकल्प व विकासाच्या योजना काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. हे प्रश्न मार्गी लागले असते तर आज वेगळ्या विदर्भाचा प्रश्न पुढे आलाच नसता. आता शिवसेना सोडली तर, सर्वच राजकिय पक्ष वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहेत. प्रकाश आंबेडकरांनाच नकोय ऐक्य !रिपाइंचे ऐक्य व्हावे ही प्रामाणिक भूमिका माझी नेहमीच राहीली आहे. एवढेच काय प्रकाश आंबेडकरांनीच या ऐक्याचे श्रेय घेऊन त्यांनीच प्रमुख बनावे, असेही मी वेळोवेळी बोललो आहे. मात्र मी ऐक्यासाठी बैठक बोलाविली की, प्रकाश आंबेडकर गैरहजर राहतात, अशी खंत खा. आठवले यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर आपणास का टाळतात? असे विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा मी ऐक्याची भूमिका घेतो, तेव्हा त्यांना असे वाटते की, शरद पवारांनीच आठवलेंना पुढे केले काय, त्यामुळे ते चर्चेत सहभागी होत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी १९९0 मध्ये ऐक्य कसे तुटले याचा किस्साही सांगीतला. प्रकाश आंबेडकर यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.