शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

घटना बदलविण्याची भाषा करणा-यांनाच बदलवून टाकू

By admin | Updated: April 25, 2016 02:04 IST

रामदास आठवले यांचा इशारा.

बुलडाणा: केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त देशभर कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांचा जयजयकार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे बाबासाहेबांचे पाईक आहेत. ते आरएसएसचे ऐकत नाहीत. बाबासाहेबांच्या संविधानावर त्यांचा विश्‍वास असून, ते घटनेप्रमाणे देश चालवित आहेत. तरीही घटना बदलविण्याची कोणी भाषा केल्यास आम्ही त्यालाच बदलवून टाकू, असा इशारा खा. रामदास आठवले यांनी दिला. जाती तोडो, भारत जोडो, समता अभियानाअंतर्गत खासदार आठवले यांनी काढलेली भारत भीम यात्रा रविवारी दुपारी बुलडाणा येथे दाखल झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खा. आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले काम करीत आहेत. इंदू मिलच्या जागेवर होणारे बाबासाहेबांचे भव्य स्मारक, महु येथील बाबासाहेबांचे निवासस्थान, याशिवाय बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेल्या इतर स्थळांचा विकास करण्याची भूमिका मोदींनी घेतली आहे. मागासवर्गीयांचे आरक्षण सुध्दा हे सरकार काढू शकत नाही. सरकारसंदर्भात वावड्या उठविल्या जात आहेत, त्यावर विश्‍वास ठेवू नका. जर कुणी संविधान बदलविण्याची भाषा करीत असेल तर त्याला सर्वप्रथम आर.पी. आय. रस्त्यावर उतरुन विरोध करेल, कारण आम्ही त्यांचे घटक पक्ष आहोत. सरकारची प्रत्येक भूमिका आम्हाला मान्य असेलच असे नाही. आमचे स्वतंत्र अस्तीत्व आहे. पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, प्रदेश कार्यध्यक्ष बाबुराव कदम, विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुधाकर तायडे, युथ रिपब्लीकनचे अध्यक्ष विजय साबळे, केशव सरकटे, जिल्हाध्यक्ष नरहरी गवई उपस्थित होते.विदर्भ राज्य व्हावे ही भाजपची भूमिका !विदर्भ राज्य वेगळे व्हावे, ही भाजपची सुरूवातीपासूनची भूमिका आहे. या भूमिकेला आरपीआयचासुध्दा पाठींबा आहे. कारण भाषावार प्रांतरचनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संमती होती. त्यामुळे वेगळा विदर्भ होईल असा विश्‍वास वाटतो. विदर्भ व मराठवाड्यावर कॉंग्रेसनेच अन्याय केला. विदर्भाच्या विकासाचे खरे मारक काँग्रेसवालेच आहेत, विदर्भातील गोसी खुर्द प्रकल्प अद्याप पुर्णत्वास गेला नाही. चंद्रपूर, गडचिरोलीपासून तर बुलडाण्यापर्यंतचे अनेक प्रकल्प व विकासाच्या योजना काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. हे प्रश्न मार्गी लागले असते तर आज वेगळ्या विदर्भाचा प्रश्न पुढे आलाच नसता. आता शिवसेना सोडली तर, सर्वच राजकिय पक्ष वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहेत. प्रकाश आंबेडकरांनाच नकोय ऐक्य !रिपाइंचे ऐक्य व्हावे ही प्रामाणिक भूमिका माझी नेहमीच राहीली आहे. एवढेच काय प्रकाश आंबेडकरांनीच या ऐक्याचे श्रेय घेऊन त्यांनीच प्रमुख बनावे, असेही मी वेळोवेळी बोललो आहे. मात्र मी ऐक्यासाठी बैठक बोलाविली की, प्रकाश आंबेडकर गैरहजर राहतात, अशी खंत खा. आठवले यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर आपणास का टाळतात? असे विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा मी ऐक्याची भूमिका घेतो, तेव्हा त्यांना असे वाटते की, शरद पवारांनीच आठवलेंना पुढे केले काय, त्यामुळे ते चर्चेत सहभागी होत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी १९९0 मध्ये ऐक्य कसे तुटले याचा किस्साही सांगीतला. प्रकाश आंबेडकर यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.