शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

२६७ गावांत केवळ एकच सार्वजनिक ‘बाप्पा‘

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:18 IST

अकोला : गावातील ऐक्य अबाधित राहून, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना सुरू आहे. ...

अकोला : गावातील ऐक्य अबाधित राहून, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना सुरू आहे. यंदा जिल्ह्यातील २६७ गावांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेचा स्वीकार करीत आपल्या गावांमध्ये एक गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे.

सण-उत्सवांदरम्यान सामाजिक सलोखा राहून गावातील ऐक्य कायम राहावे, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. एकापेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये चढाओढ निर्माण होऊन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पोलीस प्रशासनाकडून ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येते. यंदा जिल्ह्यात एकूण १३३५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी झाली आहे. अकोला शहरासह तालुक्याच्या शहरांमध्ये ५४८, तर ग्रामीण भागात ७८७ गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. यांपैकी २६७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना झाली आहे. कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवावर नियम व अटींचे बंधन आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये एक गणपतीची स्थापना झाली आहे. विविध परवानग्या, कोरोना प्रतिबंधात्मक नियम असतानाही भाविकांचा उत्साह कायम आहे. सर्व नियम व अटींचे पालन करून बाप्पांचा उत्सव साजरा करण्याचा निर्धार गणेशोत्सव मंडळांनी केला आहे.

बाप्पाच्या घरगुती प्रतिष्ठापनेवर भर

गतवर्षीप्रमाणे या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गणेशोत्सवादरम्यान गर्दी होऊ नये म्हणून शासनाकडून नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामुळे गतवर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या कमी झाली आहे. घरांमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यावर भर आहे. त्यामुळे घरोघरी श्री विराजमान झाल्याचे चित्र आहे.