शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बँकेत व्यवहारासाठी पाच जणांनाच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 16:22 IST

बँकेत एकावेळी पाच ग्राहकांनाच प्रवेश दिला जाईल.

अकोला : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बँकांच्या दैनंदिन कामकाजाच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्यस्तरीय बँकर्स समितीने सोमवारी पुणे येथील बैठकीत घेतला. त्यानुसार बँकेत एकावेळी पाच ग्राहकांनाच प्रवेश दिला जाईल. तसेच त्यांच्या परस्परांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवण्याची खबरदारी बँकांनी घ्यावी, सर्व एटीएम २४ तास कार्यरत ठेवावे, असे पत्र राज्यातील सर्वच लीड बँक मॅनेजर यांना पाठविण्यात आले.बैठकीत उपस्थित बँकर्स समितीच्या प्रतिनिधींनी विविध मुद्दे मांडले. त्यावर निर्णय घेण्यात आले. त्या निर्णयांची प्रत सर्वच जिल्ह्यांतील लीड बँक मॅनेजर यांना पाठविण्यात आली. त्यामध्ये बँकांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतच सुरू ठेवणे, बँकांमध्ये आवश्यक कामकाजासाठी गरजेएवढेच कर्मचारी उपस्थित ठेवणे, त्या कर्मचाऱ्यांना चक्राकार पद्धतीने उपस्थिती ठेवणे, बँकेत एकावेळी केवळ पाच ग्राहकांनाच प्रवेश देणे, उर्वरित ग्राहकांची रांग बँकेबाहेर लावणे, त्यांच्यामध्ये प्रत्येकी एक मीटरचे अंतर ठेवणे, याबाबतची सूचना बँकेच्या दर्शनी भागात लावणे, या पद्धतीने कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले. सोबतच एटीएममध्ये रोख भरणाºया संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र तसेच बँक व्यवहाराचे पुरावे सोबत ठेवावे, प्रशासनाने एखादा भाग संवेदनशील घोषित केला असेल, तर त्याबाबतचा निर्णय घ्यावा, बँकेच्या सेवा-सुविधा अविरतपणे ग्राहकांना मिळाव्या, यासाठी बिझनेस कन्टिन्युइटी प्लॅननुसार कामकाज करावे, असेही राज्यस्तरीय बँकर्स समितीचे संयोजक एन. एस. देशपांडे यांनी पत्रात म्हटले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक