शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

वर्षभरात केवळ ६५० शस्त्रक्रिया!

By admin | Updated: May 2, 2017 01:27 IST

महाआरोग्य शिबिरातील शस्त्रक्रिया धिम्या गतीने : रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणण्यात यंत्रणा अपयशी

अतुल जयस्वाल - अकोलाशासनाच्यावतीने जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात तपासणी झाल्यानंतर शस्त्रक्रिया सुचविलेल्या एकूण रुग्णांपैकी वर्षभरात केवळ ६५० रुग्णांवरच शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे. रुग्णांची अनास्था व त्यांना रुग्णालयापर्यंत आणण्यात आरोग्य यंत्रणेला आलेले अपयश यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत ६५० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.अकोला येथे मार्च २०१६ मध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शस्त्रक्रिया, अस्थिरोग, नाक-कान-घसा, नेत्ररोग, दंतशास्त्र, स्त्रीरोग, युरॉलॉजीशी संबंधित हजारांवर रुग्णांची नोंद घेण्यात आली. या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शहरातील काही खासगी रुग्णालयांकडे शस्त्रक्रियांसाठी ‘रेफर’ करण्यात आले होते. त्यावेळी आरोग्य शिबिरात रुग्णांच्या केवळ प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या होत्या. पुढील तपासण्यांसाठी रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयात येण्यास सांगण्यात आले होते. वैद्यकीय महाविद्यालयात आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. यासाठी रुग्णांची अंतिम यादी तयार करण्यात आली. यामध्ये ८०० पेक्षा अधिक रुग्ण होते. त्यानंतर २३ मार्च ते ३१ आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ४१५ रुग्णांवर सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बहुतांश शस्त्रक्रिया मार्च व एप्रिल महिन्यात पार पडल्या. त्यानंतर मात्र रुग्णांकडून शस्त्रक्रिया करवून घेण्याबाबत फारसे स्वारस्य दाखविण्यात आले नाही. त्यामुळे पुढील सहा महिन्यात शस्त्रक्रियांची गती आणखीनच मंदावली. ३१ आॅक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ या सहा महिन्यांच्या कालावधीत केवळ २३३ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अशाप्रकारे २३ मार्च २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत तपासणी झालेल्यांपैकी एकूण ६५० रुग्णांवरच शस्त्रक्रिया झाल्याची नोंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहे.‘आयएमए’कडील आकडा अनुपलब्धमहाआरोग्य शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांवर ‘आयएमए’अंतर्गत काही खासगी रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हा आकडा मात्र अजूनपर्यंत उपलब्ध होऊ शकला नाही. खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रिया झालेल्यांची माहिती समोर आल्यानंतर एकूण परिस्थिती समोर येऊ शकते.विशेष तपासण्या ११०० वरया शिबिरात नोंदणी झालेल्या रुग्णांना विशेष तपासण्या सूचविण्यात आल्या होत्या. मार्च २०१७ अखेरपर्यंत ११७९ रुग्णांच्या विशेष तपासण्या करण्यात आल्या.स्वस्थ महाराष्ट्र अभियानही ठरू नये फार्स१ मे पासून जिल्ह्यात पंडित दिनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ होणार आहे. गरीब, गरजू रुग्णांकरिता विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. याच उद्देशाने गतवर्षी घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात नोंदणी झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे. या पृष्ठभूमीवर नव्याने येऊ घातलेले हे अभियानही केवळ फार्स ठरू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.