शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणीटंचाई निवारणाची केवळ ४७ कामे पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:31 IST

पावसाळा सुरू झाला असून, उर्वरित ४७९ कामे अद्याप प्रलंबित आहेत.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ५ जूनपर्यंत पाणीटंचाई निवारणाची केवळ ४७ कामे पूर्ण करण्यात आली असून, ६० कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाळा सुरू झाला असून, उर्वरित ४७९ कामे अद्याप प्रलंबित आहेत.यावर्षीच्या गत उन्हाळ्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील ४९१ गावांमध्ये विविध ५८६ उपाययोजनांची कामे कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांनुसार १३६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ११० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या कामांपैकी ५ जूनपर्यंत जिल्ह्यातील केवळ ४५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४७ कामे पूर्ण करण्यात आली असून, ६० उपाययोजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. उन्हाळा संपला असून, पावसाळा सुरू झाल्याने, ३० जूनपर्यंतच पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात प्रस्तावित जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची उर्वरित प्रलंबित असलेली ४७९ कामे ३० जूनपर्यंत पूर्ण कशी होणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पूर्ण केलेल्या कामांचा निधीही प्रलंबित!जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी ४५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४७ कामे पूर्ण करण्यात आली; मात्र पूर्ण करण्यात आलेल्या या कामांचा ६२ लाख १६ हजार रुपयांचा निधीही अद्याप शासनामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त होणे प्रलंबित आहे. तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा निधीदेखील प्रलंबित आहे.

प्रगतिपथावर अशी आहेत कामे!जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाची ६० कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये ७ तात्पुरत्या पूरक नळयोजना, १८ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, १५ नवीन विंधन विहिरी व २० हातपंपांची दुरुस्ती इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश असून, सुरू असलेली ही कामे ३० जूनपर्यंत पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होती. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कमीत-कमी कामे करण्यात आली. ‘कोरोना’संकटाच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी निधीदेखिल उपलब्ध नाही.- किशोर ढवळेकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई