शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’ अंतर्गत राखीव जागांवर केवळ ४0 टक्के प्रवेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 14:51 IST

अकोला: राज्यात सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया केवळ ४0 टक्केच आटोपली आहे.

ठळक मुद्देराज्यातील ८ हजार ९७३ शाळांमध्ये १ लाख २६ हजार ११७ राखीव जागा आहेत;या राखीव जागांवर अद्यापपर्यंत केवळ ४९ हजार २२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. उर्वरित ७६ हजार ८९१ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

अकोला: राज्यात सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया केवळ ४0 टक्केच आटोपली आहे. अद्यापही ६0 टक्के जागा रिक्त असल्याने, पालक त्रस्त झाले आहेत. बालकांचा मोफत शिक्षण व शिक्षण हक्क कायदा असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही आणि गोरगरीब मुलांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देण्याविषयी अनास्था असल्यामुळेच सातत्याने ही प्रवेश प्रक्रिया रखडत आहे. राज्यातील ८ हजार ९७३ शाळांमध्ये १ लाख २६ हजार ११७ राखीव जागा आहेत; परंतु या राखीव जागांवर अद्यापपर्यंत केवळ ४९ हजार २२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. उर्वरित ७६ हजार ८९१ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.इंग्रजी शाळांमधील राखीव जागांवर विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. काही शाळा निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असल्याने, पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असल्याचे म्हणत शिक्षण विभागाला प्रवेश नाकारणाºया शाळांवर कायदेशीर कारवाई करण्यास बजावले आहे; परंतु शिक्षण विभागाने एकाही शाळेवर कारवाई केल्याचे ऐकीवात नाही. राज्यात आरटीई नोंदणीकृत ८ हजार ९७३ शाळा आहेत. या शाळांमध्ये १ लाख २६ हजार ११७ राखीव जागा आहेत. या जागांसाठी राज्यभरात १ लाख ७६ हजार पालकांनी आॅनलाइन नोंदणी करून आपल्या परिसरातील इंग्रजी शाळांची निवड केली. सुरुवातीला पालकांना २४ एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्यास सांगण्यात आले; परंतु पालकांसमोर भाडेकरारनाम्यासह प्रवेशासाठी शाळांकडून टाळाटाळ केली जात होती. असा प्रकार राज्यात बºयाच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सुरू असल्याने पालकांनी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने ‘आरटीई’अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे हे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आणि ज्या शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास शिक्षण विभागाला बजावले.असे असतानाही शेकडो इंग्रजी शाळा विद्यार्थ्यांना राखीव जागांवर प्रवेश नाकारत असल्याचे चित्र आहे, तरीही शिक्षण विभागाने या शाळांवर कारवाईची धमक दाखविली नाही. शिक्षण हक्क कायदा असूनही गरिबांच्या मुलांना राखीव जागांवरच प्रवेश मिळत नसल्याने, हा कायदा कुचकामी ठरत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. प्रवेशाची मुदत वाढविण्याची मागणी‘आरटीई’अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला २४ एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख होती; परंतु अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबले आहेत. राज्यातील ७६ हजार ८९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबल्यामुळे प्रवेशासाठी शासनाने पुन्हा मुदतवाढ द्यावी आणि प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी पालक करीत आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिक