शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ३ लाख क्विंटल ‘सोयाबीन’चेच प्रमाणीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 10:12 IST

४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांनाच प्रमाणीकरण मिळाले.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र (महाबीज) राज्य बियाणे महामंडळाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांनाच प्रमाणीकरण मिळाले. परिणामी यंदा महाबीज नियोजित उद्दिष्टपूर्ती करू शकले नाही. दुसरीकडे बियाणे न उगवल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने महाबीजला बियाण्यांच्या तुटवड्यालाही सामोरे जावे लागत आहे.राज्यात खरीप हंगामासाठी जवळपास ७ ते ८ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची आवश्यकता भासते. या बियाण्यांच्या पुरवठ्यामध्ये अर्धा वाटा हा महाबीजचा असतो. त्यानुसार, यंदा महाबीजने ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार, महाबीजने राज्याबाहेरदेखील बीजोत्पादन कार्यक्रम घेतल्याने महाबीजकडे कच्चा माल उपलब्ध होता. लॉकडाऊनच्या काळात नागपूर येथील बियाणे प्रक्रिया केंद्र बंद होते; मात्र चिखली, वाशिम, अकोला आणि हिंगोली येथील बियाणे प्रक्रियेचे काम सुरू होते. बियाणे प्रक्रिया झाल्यानंतर शासनाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. तसेच पीक प्रात्याक्षिक घेतल्यानंतरच ते बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. त्यानुसार, यंदा विक्रमी बीजोत्पादन करूनही केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांना प्रमाणीकरण मिळाल्याने एकूण उद्दिष्टामध्ये १.२५ लाख क्विंटलची तूट पडली. अशातच राज्यातील अनेक भागात पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्याही तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे अहवालाची प्रतीक्षा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचे निर्देश शासनाने महाबीजला दिले. सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असताना शेतकºयांना बियाणे वाटपाचे मोठे आव्हान महाबीजपुढे आहे.

गतवर्षीच्या पुराचा फटका!गतवर्षी राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती होती. बीजोत्पादनासाठी साठवलेले सोयाबीनचे बियाणे पावसात भिजल्याने यंदा महाबीजला मोठा फटका बसल्याची माहिती आहे.

दोन लाख क्विंटल बियाणे नापास!यंदा महाबीजने उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याबाहेरही बीजोत्पादन कार्यक्रम घेतले. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळातही बियाणे प्रक्रिया करून तब्बल ५ लाख ६३ हजार बियाण्यांचे उत्पादन घेत ते महाराष्ट्र बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे पाठविले; मात्र त्यापैकी केवळ ३ लाख बियाण्यांना प्रमाणपत्र मिळाले. तर दोन लाख ६३ हजार क्विंटल बियाणे प्रमाणीकरणात नापास झाल्याने महाबीजला मोठा फटका बसल्याची माहिती आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाणांचे उद्दिष्ट ठेवले होते; मात्र गतवर्षी आलेल्या पुरामध्ये अनेक ठिकाणी बियाणे पाण्यात भिजल्याने त्याचा फटका यंदा बसला.- अनिल भंडारी, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीजAgriculture Sectorशेती क्षेत्र