शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

केवळ ३ लाख क्विंटल ‘सोयाबीन’चेच प्रमाणीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 10:12 IST

४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांनाच प्रमाणीकरण मिळाले.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र (महाबीज) राज्य बियाणे महामंडळाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांनाच प्रमाणीकरण मिळाले. परिणामी यंदा महाबीज नियोजित उद्दिष्टपूर्ती करू शकले नाही. दुसरीकडे बियाणे न उगवल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने महाबीजला बियाण्यांच्या तुटवड्यालाही सामोरे जावे लागत आहे.राज्यात खरीप हंगामासाठी जवळपास ७ ते ८ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची आवश्यकता भासते. या बियाण्यांच्या पुरवठ्यामध्ये अर्धा वाटा हा महाबीजचा असतो. त्यानुसार, यंदा महाबीजने ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार, महाबीजने राज्याबाहेरदेखील बीजोत्पादन कार्यक्रम घेतल्याने महाबीजकडे कच्चा माल उपलब्ध होता. लॉकडाऊनच्या काळात नागपूर येथील बियाणे प्रक्रिया केंद्र बंद होते; मात्र चिखली, वाशिम, अकोला आणि हिंगोली येथील बियाणे प्रक्रियेचे काम सुरू होते. बियाणे प्रक्रिया झाल्यानंतर शासनाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. तसेच पीक प्रात्याक्षिक घेतल्यानंतरच ते बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. त्यानुसार, यंदा विक्रमी बीजोत्पादन करूनही केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांना प्रमाणीकरण मिळाल्याने एकूण उद्दिष्टामध्ये १.२५ लाख क्विंटलची तूट पडली. अशातच राज्यातील अनेक भागात पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्याही तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे अहवालाची प्रतीक्षा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचे निर्देश शासनाने महाबीजला दिले. सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असताना शेतकºयांना बियाणे वाटपाचे मोठे आव्हान महाबीजपुढे आहे.

गतवर्षीच्या पुराचा फटका!गतवर्षी राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती होती. बीजोत्पादनासाठी साठवलेले सोयाबीनचे बियाणे पावसात भिजल्याने यंदा महाबीजला मोठा फटका बसल्याची माहिती आहे.

दोन लाख क्विंटल बियाणे नापास!यंदा महाबीजने उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याबाहेरही बीजोत्पादन कार्यक्रम घेतले. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळातही बियाणे प्रक्रिया करून तब्बल ५ लाख ६३ हजार बियाण्यांचे उत्पादन घेत ते महाराष्ट्र बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे पाठविले; मात्र त्यापैकी केवळ ३ लाख बियाण्यांना प्रमाणपत्र मिळाले. तर दोन लाख ६३ हजार क्विंटल बियाणे प्रमाणीकरणात नापास झाल्याने महाबीजला मोठा फटका बसल्याची माहिती आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाणांचे उद्दिष्ट ठेवले होते; मात्र गतवर्षी आलेल्या पुरामध्ये अनेक ठिकाणी बियाणे पाण्यात भिजल्याने त्याचा फटका यंदा बसला.- अनिल भंडारी, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीजAgriculture Sectorशेती क्षेत्र