शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

केवळ ३ लाख क्विंटल ‘सोयाबीन’चेच प्रमाणीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 10:12 IST

४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांनाच प्रमाणीकरण मिळाले.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र (महाबीज) राज्य बियाणे महामंडळाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांनाच प्रमाणीकरण मिळाले. परिणामी यंदा महाबीज नियोजित उद्दिष्टपूर्ती करू शकले नाही. दुसरीकडे बियाणे न उगवल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने महाबीजला बियाण्यांच्या तुटवड्यालाही सामोरे जावे लागत आहे.राज्यात खरीप हंगामासाठी जवळपास ७ ते ८ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची आवश्यकता भासते. या बियाण्यांच्या पुरवठ्यामध्ये अर्धा वाटा हा महाबीजचा असतो. त्यानुसार, यंदा महाबीजने ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार, महाबीजने राज्याबाहेरदेखील बीजोत्पादन कार्यक्रम घेतल्याने महाबीजकडे कच्चा माल उपलब्ध होता. लॉकडाऊनच्या काळात नागपूर येथील बियाणे प्रक्रिया केंद्र बंद होते; मात्र चिखली, वाशिम, अकोला आणि हिंगोली येथील बियाणे प्रक्रियेचे काम सुरू होते. बियाणे प्रक्रिया झाल्यानंतर शासनाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. तसेच पीक प्रात्याक्षिक घेतल्यानंतरच ते बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. त्यानुसार, यंदा विक्रमी बीजोत्पादन करूनही केवळ ३ लाख क्विंटल बियाण्यांना प्रमाणीकरण मिळाल्याने एकूण उद्दिष्टामध्ये १.२५ लाख क्विंटलची तूट पडली. अशातच राज्यातील अनेक भागात पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्याही तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे अहवालाची प्रतीक्षा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचे निर्देश शासनाने महाबीजला दिले. सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असताना शेतकºयांना बियाणे वाटपाचे मोठे आव्हान महाबीजपुढे आहे.

गतवर्षीच्या पुराचा फटका!गतवर्षी राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती होती. बीजोत्पादनासाठी साठवलेले सोयाबीनचे बियाणे पावसात भिजल्याने यंदा महाबीजला मोठा फटका बसल्याची माहिती आहे.

दोन लाख क्विंटल बियाणे नापास!यंदा महाबीजने उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याबाहेरही बीजोत्पादन कार्यक्रम घेतले. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळातही बियाणे प्रक्रिया करून तब्बल ५ लाख ६३ हजार बियाण्यांचे उत्पादन घेत ते महाराष्ट्र बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे पाठविले; मात्र त्यापैकी केवळ ३ लाख बियाण्यांना प्रमाणपत्र मिळाले. तर दोन लाख ६३ हजार क्विंटल बियाणे प्रमाणीकरणात नापास झाल्याने महाबीजला मोठा फटका बसल्याची माहिती आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाणांचे उद्दिष्ट ठेवले होते; मात्र गतवर्षी आलेल्या पुरामध्ये अनेक ठिकाणी बियाणे पाण्यात भिजल्याने त्याचा फटका यंदा बसला.- अनिल भंडारी, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीजAgriculture Sectorशेती क्षेत्र