शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

अतिक्रमण नियमानुकूलसाठी केवळ १४०५ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 14:25 IST

शुल्क घेऊन नियमानुकूल करण्यासाठी १०१८ प्रस्तावांवर कार्यवाही सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागातील गावठाणात केलेल्या अतिक्रमणाच्या जागांची शासकीय किंमत वसूल करून त्या जागांची मालकी संबंधितांना देण्यासाठी जिल्ह्यात केवळ १४०५ प्रस्तावच तयार झाले आहेत. त्यापैकी १०१८ प्रस्तावांनुसार संबंधितांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जागांची ही संख्या पाहता जिल्ह्यातील हजारो लाभार्थी अद्यापही वंचित असल्याचे स्पष्ट होत आहे.रमाई आवास योजना, शबरी, पंतप्रधान आवास योजनेसाठी ग्रामीण भागातील लाभार्थींजवळ मालकीची जागा असणे बंधनकारक करण्यात आले. ज्यांच्याकडे जागा आहे, ते घरकुलासाठी अपात्र तर ते पात्र आहेत त्यांच्याकडे मालकीची जागा नाही, अशी विचित्र अवस्था ग्रामीण भागात निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून संबंधित लाभार्थींना अतिक्रमण केले असल्यास त्या जागेची शासकीय किंमत वसूल करून ती जागा लाभार्थींच्या नावे करण्याचा उपाय सुरू झाला. त्यासाठी ग्रामीण भागात गावठाणात असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायतीमधील नमुना आठ (कर आकारणी नोंदवही)मधील माहितीनुसारच अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे ठरले. नियमानुकूल करण्यासाठी राज्यभरात ४ लाख ७३ हजार २४८ जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या आहे. १०,०३३ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये अतिक्रमणाचे प्रस्ताव घेण्यात आले. त्यामध्ये २, २३, ९३५ प्रकरणे आहेत. त्यापैकी आॅनलाइन झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर मंजुरी देण्यात आली. अकोला जिल्ह्यात केवळ १४०५ प्रकरणेच प्राप्त आहेत. शुल्क घेऊन नियमानुकूल करण्यासाठी १०१८ प्रस्तावांवर कार्यवाही सुरू झाली आहे. ही संख्या पाहता जिल्ह्यातील शेकडो अतिक्रमक या प्रक्रियेतून लांबच असल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वात कमी संख्या अकोला तालुक्यातील असल्याचे दिसत आहे. अतिक्रमण करणाºयाने जागेची शासकीय किंमत जमा केल्यानंतरच मालकी हक्काची नोंद केली जाणार आहे. संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून ही कार्यवाही होत आहे. त्याचवेळी प्रत्येक पंचायत समितीमधील शेकडो लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Akolaअकोला