शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्हा स्तरावरून मागविणार ऑनलाईन अहवाल

By admin | Updated: October 29, 2014 01:29 IST

स्वच्छता अभियानाच्या कामकाजावर आता विभागीय आयुक्तांची नजर !

संतोष मुंढे / वाशिमस्वच्छतेसाठी सरकारने हाती घेतलेल्या अभियानात जिल्हा प्रशासन, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे योगदान कसे आहे, यावर विभागीय आयुक्तांची करडी नजर राहणार आहे. या मोहिमेसाठी वेळोवेळी केलेल्या उपक्रमांचा ऑनलाईन अहवाल आयुक्त कार्यालय मागविणार असून, त्याचा विभाग स्तरावर आढावाही घेतला जाणार आहे.२ ऑक्टोबर २0१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हातात झाडू घेऊन भारत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला. स्वच्छता अभियानात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी सकल जनांना केले. प्रशासकीय यंत्रणाही याकामी लावण्यात आली असून, २ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान स्वत:चे कार्यालय व परिसर स्वच्छ करण्याची मोहीम प्रायोगिक तत्त्वावर हाती घेण्यात आली. या मोहिमेस व्यापक स्वरूप देण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना दिशानिर्देशित करण्यात आले होते. याबाबत २१ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांकडून प्रगती अहवाल घेतल्यानंतर ही मोहीम आणखी गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी जिल्हा पातळीवरुन अहवाल मागविण्याचे काम सुरु केले आहे. २९ ऑक्टोबर रोजी अमरावती विभागीय आयुक्त हे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिमचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच अमरावती आणि अकोला महानगरपालिका आयुक्त आणि उपआयुक्तांकडून एकूणच कामाचा आढावा घेणार आहेत.राज्यपाल, विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार स्वच्छता अभियानाला गती देण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपासून अभियान आणखी गतिमान करण्याचा अँक्शन प्लॅन तयार असून, अभियानाबाबत कुचराई आढळून आल्यास दोषींवर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगीतले.