शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आता पेन्शनर्सच बँकेला देणार जिवंत असल्याचा आॅनलाइन पुरावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:23 IST

अकोला : पेन्शनर्सला जीवन प्रमाण अर्थात जिवंत असल्याचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) बँकेत दरवर्षी नोव्हेंबर वा डिझेंबरमध्ये जमा करण्याची आता आवश्यकता नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पेन्शनर्सला जीवन प्रमाण अर्थात जिवंत असल्याचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) बँकेत दरवर्षी नोव्हेंबर वा डिझेंबरमध्ये जमा करण्याची आता आवश्यकता नाही. केंद्र सरकारने पेन्शनर्ससाठी नोव्हेंबर-२०१८ मध्ये पोर्टल सुरू करून आॅनलाइन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे पेन्शनर्सची बँकेच्या वेळखाऊ कटकटीपासून मुक्तता झाली असून, त्यांना तासभर रांगेत उभेही राहावे लागणार नाही. ही सुविधा सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे.पेन्शनर्सने एखाद्या सायबर कॅफेमधून पोर्टलवर क्लिक करून अंगठ्याचा ठसा, आधार क्रमांक आणि बँकेचा अकाउंट क्रमांक दिल्यानंतर त्यांच्या रजिस्टर क्रमांकावर ‘ओटीपी’ पाठविला जाईल आणि बँकेला काही सेकंदातच जीवन प्रमाणपत्र सादर होईल. त्यानंतर पेन्शनर्सचे अकाउंट अपडेट होणार आहे. ही प्रक्रिया पेन्शनर्सला दरवर्षी करावी लागणार आहे. ही सुविधा सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी सुरू केली आहे. याकरिता प्रत्येक बँकेने केंद्रीय पेन्शन प्रोसेस सेंटर (सीपीपीसी) सुरू केले आहे. भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाने देशभरात १६ ‘सीपीपीसी’ सुरू केले आहे. त्यात अकोल्याचादेखील समावेश आहे. ‘एसबीआय’सोबतच, सेंट्रल बँक, बँक आॅफ इंडियासह जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ही सुविधा होत आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या पोर्टलवर पेन्शनर्सला बँकेत न येता थेट विदेशातूनही लिंक करता येणार आहे. या प्रक्रियेला ई-केवायसी असे नाव दिले आहे.पेन्शनर्सला ही प्रक्रिया नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पूर्ण करायची आहे. न केल्यास जानेवारीमध्ये पेन्शन बंद होणार आहे. आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पेन्शनर्सला ओटीपी आल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाली, असे समजायचे. त्यानंतर पेन्शनर्सच्या खात्यात महिन्याची पेन्शन जमा झाल्याचा मॅसेज येणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहजरीत्या पूर्ण करता येते. प्रत्येक बँकेने पेन्शनर्ससाठी ‘सीपीपीसी’ सुरू केले आहे.रांगेत उभे राहण्यापासून सुटकापोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले, की केंद्र सरकारने पोर्टल सुरू करून पेन्शनर्सला मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बँकेत जाणे आणि रांगेत उभे राहण्यापासून सुटका झाली आहे. नोव्हेंबरमध्ये पोर्टलवरून ई-केवायसी केले आहे. त्यामुळे अकाउंट सुरळीत झाले आहे.

सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी ही सुविधा सर्वोत्तम आहे. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे; मात्र अनेकदा वयानुसार बोटांचे ठसे नष्ट होतात. अशावेळी त्यांना प्रत्यक्ष आणल्याशिवाय पर्याय नाही.-आलोककुमार तरेनिया,एलडीएम अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक