शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

रोहयोच्या कामांना आॅनलाइन मंजुरीला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:50 IST

अ‍ॅपद्वारे कामांना आॅनलाइन मंजुरी घेण्यात विविध यंत्रणांमध्ये कमालीची उदासीनता असल्याची माहिती आहे.

अकोला: राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांना आॅनलाइन प्रणालीत प्रशासकीय, तांत्रिक मंजुरी देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘सिक्युअर’ अ‍ॅपमध्ये महाराष्ट्रात मार्च २०१९ अखेरपर्यंत मंजुरी मिळालेल्या कामांचा समावेश होण्याची अडचण निकाली निघाली असताना त्या अ‍ॅपद्वारे कामांना आॅनलाइन मंजुरी घेण्यात विविध यंत्रणांमध्ये कमालीची उदासीनता असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात कामांना मंजुरीचे प्रमाण अत्यल्प असल्याने दुष्काळात कामे उपलब्ध होण्याची शक्यताही मावळत आहे.राज्यात रोजगार हमी योजनेच्या २०१९-२० या वर्षासाठी कामांचा आराखडा तयार झाला. कामांना प्रशासकीय, तांत्रिक मंजुरीही देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी केंद्र शासनाने ‘सिक्युअर’ अ‍ॅपचा वापर बंधनकारक केला. त्यानुसार मार्च २०१९ पासून अ‍ॅपद्वारेच कामांना प्रशासकीय, तांत्रिक मंजुरी देण्याची पद्धत सुरू झाली. त्यापूर्वी म्हणजे, मार्च २०१९ पर्यंत राज्यातील हजारो कामांना दोन्ही मान्यता मिळाल्या. ती कामे ‘सिक्युअर’मध्ये समाविष्टच होत नसल्याचा प्रकार राज्यभरात घडला. त्यामुळे कामे सुरू करणेच अशक्य झाले. त्यावर राज्याच्या रोहयो आयुक्तांनी दिल्लीतील तंत्रज्ञाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करीत ही समस्या निकाली काढली; मात्र त्यानंतरही कामांना अ‍ॅपद्वारे आॅनलाइन तांत्रिक मंजुरी घेण्याच्या प्रमाणात अद्यापही सुधारणा झालेली नाही. विविध यंत्रणांकडून मंजुरीसाठी अ‍ॅपमध्ये अंदाजपत्रकच भरले जात नाही. अ‍ॅपमध्ये ठरल्याप्रमाणे प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी ठरलेली आहे; मात्र प्रस्तावच नसल्याने मंजुरी कोणत्या कामांना द्यावी, या विवंचनेत वरिष्ठ पातळीवरील अधिकारी आहेत.त्यासाठी ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेतून करावयाच्या कामांचा आराखडा आधीच प्रशासनाकडे तयार ठेवला जातो. त्या आराखड्याला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मंजुरी दिली जाते. प्रत्यक्षात काम सुरू करण्यापूर्वी प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी आॅनलाइन घेणे बंधनकारक करण्यात आले; मात्र त्याबाबत राज्यभरातून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे नागपूर येथील आयुक्त एस.ए.आर. नायकयांच्याकडे तक्रारी झाल्या. त्यांनी केंद्रातील संयुक्त सचिव, तांत्रिक अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करीत समस्या निकाली काढली; मात्र आता मंजुरीसाठी प्रस्तावच नसल्याची माहिती आहे.- काम न दिल्यास भत्त्याचा दावादुष्काळी भागात मजुरांच्या हाताला काम देणे, काम देण्यास शासन असमर्थ ठरल्यास मजुरांना बेकारी भत्ता देण्याची तरतूद महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्यात आहे. कायद्यातील या तरतुदीनुसार कामावर असलेल्या मजुरांना वेळेवर मजुरी देणे, ही जबाबदारीही शासनाची आहे. विविध यंत्रणांकडून कामांना मंजुरीसाठी येणारे प्रस्ताव त्या-त्या टप्प्यावर संबंधित अधिकाºयांना दिसतात. मंजुरीच्या स्तरावर तशा प्रस्तावांची संख्या अल्प असल्याने यंत्रणांना त्याबाबत कळविले जाईल.- मनोज लोणारकर, उपजिल्हाधिकारी रोहयो.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजना