शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आवक नसल्याने कांद्याचे भाव वधारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:46 IST

अकोला : जिल्हा परिसरातील कांदा संपल्याने आणि बाहेरून येणार्‍या कांद्याची आवक घटल्याने अकोल्यात गेल्या आठवड्यापासून कांद्याचे भाव वधारले आहेत. सातशे-आठशे रुपये क्विंटलचा कांदा अकोल्यात दोन हजार  ते पंचवीसशे रुपये क्विंटलच्या दराने विकला जात आहे. दोन महिन्याआधी अकोल्यात बेभाव मिळणारा कांदा अचानक वधारल्याने सर्वसामान्यांची भाजी महागली आहे.

ठळक मुद्दे२५00 रुपये क्विंटल दराने विकला जातोय कांदा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिसरातील कांदा संपल्याने आणि बाहेरून येणार्‍या कांद्याची आवक घटल्याने अकोल्यात गेल्या आठवड्यापासून कांद्याचे भाव वधारले आहेत. सातशे-आठशे रुपये क्विंटलचा कांदा अकोल्यात दोन हजार  ते पंचवीसशे रुपये क्विंटलच्या दराने विकला जात आहे. दोन महिन्याआधी अकोल्यात बेभाव मिळणारा कांदा अचानक वधारल्याने सर्वसामान्यांची भाजी महागली आहे. अकोला जिल्ह्यात आणि सीमावर्तीय भागात मोठय़ा प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. मात्र, तरीही अकोल्याला हा कांदा पुरेसा नसतो. त्यामुळे जूननंतर अकोला परिसरात नाशिक, लासलगाव येथून कांदा मोठय़ा प्रमाणात येत असतो. दरवर्षी याच कार्यकाळात लासलगावचा कांदा येतो. मात्र, नाशिक परिसरात आलेल्या पुरामुळे यंदा लासलगावचा कांदाही अपुरा पडतो आहे. कारण लासलगावचा कांदा राज्यातच नव्हे, तर देश आणि आशिया खंडात सर्वत्र पोहोचतो. मात्र, यंदाची स्थिती काही निश्‍चित नाही. त्यामुळे अकोला पोहोचविला जाणारा कांदाही महाग झाला आहे. जो कांदा कधीकाळी सातशे ते हजार रुपये क्विंटल होता, तोच कांदा आता दोन हजार ते पंचवीसशे रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. कांद्याचे भाव कडाडल्याने आता सर्वसामान्य माणसाच्या घरातील किचनचे बजेट बिघडले आहे. कारण दररोजच्या वापरात असलेला कांदा महागल्याने नागरिकांच्या डोळ्य़ात पाणी आले आहे. वधारलेल्या भावाने कांद्याला चांगले दिवस आले असले, तरी यातील किती पैसा कास्तकारांच्या घरात जातो, हा मात्र संशोधनाचा विषय ठरतो आहे.

कांद्याचे भाव गेल्या आठ दिवसांपासून वधारले असले, तरी ही स्थिती स्थिर राहणारी नाही. लासलगावचा कांदा येतो आहे. सोबतच राज्याबाहेरूनही कांदा येण्यास सुरुवात झाली की पुन्हा काद्यांचे भाव कमी होतील.-नीलेश पवित्रकार, काद्यांचे ठोक व्यावसायी, अकोला.