शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिल्ह्यातील एक हजार २४६ गुन्हेगार क्रिप्स योजनेत घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:13 IST

गुन्हेगारांच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन त्यांना गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी, गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी १५ ...

गुन्हेगारांच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन त्यांना गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी, गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून परावृत्त करण्यासाठी १५ ऑगस्टपासून क्रीप्स हा उपक्रम पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विविध पाेलीस स्टेशन तसेच विविध शाखेत कार्यरत असलेल्या २९४ पाेलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या २९४ पाेलीस कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्यातील सुमारे एक हजार २४७ गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या गुन्हेगारांच्या रोजच्या हालचाली पोलीस स्टेशन स्तरावर नोंद करण्यात येत आहेत. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेष सपकाळ, विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी गुन्हेगार दत्तक याेजना राबविण्यास प्रयत्न केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी माेठा हातभार लागला आहे.

२३ नोडल ऑफिसर नियंत्रण ठेवण्यासाठी

तसेच माहिती गाेळा करण्यासाठी २९४ अंमलदार

गुन्हेगारांवर अंकुश मिळविण्यासाठी २३ नाेडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. २३ नाेडल ऑफिसर व २९४ पाेलीस अंमलदार यांनी जिल्ह्यातील तब्बल एक हजार २४६ गुन्हेगारांना दत्तक घेतले असून, त्यांना गुन्हे करण्यापासून राेखण्यात येत आहे. याचे सकारात्मक परिणाम होत असल्याची माहिती आहे.

अनेकांचा गुन्हेगारी सोडण्याचा प्रयत्न

हे गुन्हेगार पाेलिसांच्या मदतीने आता याेग्य कामाला लागल्याची माहिती आहे. पोलिसांनी दत्तक घेतलेल्या गुन्हेगारांनी गुन्हेगारी विश्व सोडवण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे गुन्हेगारांनाही कुटुंबीयांसोबत चांगले आयुष्य जगण्याची एक नवी आशा मिळाली आहे.

दत्तक घेतलेले गुन्हेगार - १२४६

नोडल अधिकारी - २३

लक्ष ठेवणारे पोलीस अंमलदार - २९४

गुन्हेगार दत्तक योजनेसाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या माध्यमातून गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागते तसेच ते काय कामकाज करीत आहेत, त्यांच्या हालचालीवर संबंधित नोडल ऑफिसर, पोलीस अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून असतात. त्यामुळे या गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. काही गुन्हेगार योग्य कामाला लागल्याचे वास्तव आहे.

- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक अकोला