शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

एक आमदार, दोन मतदारसंघ; २०१९ मधील निवडणुकांसाठी भाजपाची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 16:07 IST

अकोला: ओसरत्या मोदी लाटेचा धसका घेत भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली असून, पक्षातील प्रत्येक आमदाराकडे विधानसभेच्या आणखी एका मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

- आशिष गावंडेअकोला: ओसरत्या मोदी लाटेचा धसका घेत भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली असून, पक्षातील प्रत्येक आमदाराकडे विधानसभेच्या आणखी एका मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणेच बुथ प्रमुखांकडे ८०० ते १२०० मतदारांची जबाबदारी ठेवण्यात आली आहे. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर होणाऱ्या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत ‘वॉररूम’ स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.२०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपाची बुथ प्रमुखांची रचना यशस्वी ठरली होती. ८०० ते १२०० मतदारांसाठी एक बुथ प्रमुख नेमून २५ कार्यकर्त्यांचे पथक त्यांच्या मदतीसाठी देण्यात आले होते. आगामी निवडणुकांसाठी भाजपच्यावतीने अशीच रचना केली जात आहे. बुथ प्रमुखाला त्याच्या मोबाइलवर ‘पीएम’ अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले आहे. मतदारांची भाषा, संस्कृतीची माहिती घेणे, लोकांचा राजकीय कल कुठे आहे, मतदारांमध्ये कोणती राजकीय चर्चा केली जात आहे, याबाबतची माहिती बुथ प्रमुख आणि त्यांचे पथक घेणार आहे. ही माहिती वॉर्ड प्रमुख, मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाच्या वॉररूमला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी मुंबईत ‘वॉर रूम’चे गठन होणार असून, त्यामध्ये मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख नेते यांच्यात चर्चा होऊन त्यानुसार निर्णय घेतले जातील.मुख्यमंत्री, नेत्यांमधील चर्चेसाठी ‘वॉररूम’भाजपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची लाट ओसरल्याची कल्पना येताच, संघटनात्मक बळ आणि अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी पक्ष सरसावल्याची माहिती आहे. मतदारसंघात खासदार आणि आमदारांबद्दल मतदारांचे मत काय आहे, याबाबतचे अहवाल भाजपने तयार केले आहेत. ज्या आमदारांबद्दल जनमत चांगले नाही, त्यांची तिकिटे कापली जाण्याचे संकेत आहेत. कमकुवत उमेदवार असणाºया मतदारसंघात अन्य पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देण्याची रणनीती आखण्यात आली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री व नेत्यांमधील चर्चेसाठी मुंबईत ‘वॉररूम’ स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.

आमदारांचा कस लागणार!भाजपाच्यावतीने पक्षातील प्रत्येक आमदाराकडे एका विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राज्यात भाजपाप्रती असंतोष वाढला असल्याचे निदर्शनास येताच पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आता एका आमदाराकडे दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्याच्या हालचाली सुुरू झाल्या आहेत. यानिमित्ताने संबंधित आमदारांचे राजकीय कसब पणाला लागणार असून, त्यांना ते सिद्ध करावे लागणार असल्याचे बोलल्या जात आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाElectionनिवडणूक