शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

वाड्याचा दरवाजा एक, शेतीलाही नाही धुरा!

By admin | Updated: May 15, 2015 01:14 IST

आंतरराष्ट्रीय एकत्र कुटुंब दिवस; खामगावात नांदते ३५ जणांचे एकत्र कुटुंब.

गिरीश राऊत / खामगाव : काळ बदलला तसे नातेही बदलल्याचे चित्र आताच्या परिस्थितीत दिसून येते; मात्र असे असतानाही काही कुटुंबांनी एकत्र नांदण्याचा आदर्श टिकवून ठेवला आहे. मानपान, रुसवे-फुगवे तर सर्वच कुटुंबात असतात; परंतु एकत्र कुटुंबाचे फायदेच अधिक असल्याने अशा रुसव्या-फुगव्याचे आयुष्य फार थोडे असते. खामगाव शहरातील जुनी वस्ती म्हणून ओळख असलेल्या सुटाळपुरा भागातही असे एक एकत्र कुटुंब सुखनैव संसार करीत आहे. या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या वाड्याला एकच दरवाजा असून, ७0 एकर श्ो तीला धुरा नाही. वयाची ८६ वर्षे गाठणारे विश्‍वनाथ दळी हे या कुटुंबाचे प्रमुख आहेत त्यांना ५ मुले व १ मुलगी. मुलांची लग्न झाल्यानंतर हे कुटुंब १२ सदस्यांचे झाले. नातू झाल्यानंतर ही कुटुंब सं ख्या २८ वर पोहोचली; मात्र तरीही कुटुंब विभक्त झाले नाही. या २८ जणांसाठी किराणा एकत्रच व स्वयंपाकसुद्धा एकत्र. घरखर्च हा शेतीतून आलेल्या मिळकतीतून. घराचा व्यवहार विश्‍वनाथ दळी तसेच सर्व मुलांकडे; मात्र कोणाला काही गरज पडली तर त्याने सांगायच्या आधीच ती गरज ओळखून त्याला ती पुरविणे हे कुटुंबाचे वैशिष्ट्य. यामुळे कोणालाही आ पली परवड होत असल्याची जाणीव झाली नाही. शेत, किराणा दुकान, म्हशी यामुळे शक्य तोवर ज्या वस्तू गरजेच्या आहे त्या घरातच असल्याने कोणालाही कशाची भ्रांत पडली नाही. विश्‍वनाथ दळी यांच्या नातवांची लग्ने झाल्यानंतर कुटुंबाचा पुन्हा विस्तार होऊन ही संख्या वाढत जाऊन ३0 तर आज त्यांचे पणतू अशी आता कुटुंबातील सदस्य संख्या ३५ एवढी झाली आहे. कालांतराने परिस्थिती बदलत गेली. धावपळीचे युग सुरू झाले. अशा परिस्थितीत एकत्र स्वयंपाक त्यासाठी लागणारा वेळ व घराबाहेर पडल्याची वेळ. ऐन कामाच्या वेळी मुलांचा आईजवळ राहण्याचा हट्ट, शाळेसाठी त्यांना लागणारा डबा यांचा ताळमेळ बसविण्यासाठी म्हणून आता फक्त चुली वेगळ्या आहेत.