शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

यावर्षीही रब्बीत तेलबिया क्षेत्र घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 14:36 IST

अकोला: राज्यातील तेलबियाचे क्षेत्र दरवर्षी कमी होत असून, यावर्षीही रब्बी हंगामात करडई ९, जवस १२ तर तीळ २४ टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी करण्यात आली. याचा परिणाम तेल दरवाढीवर होण्याची शक्यता आहे.

अकोला: राज्यातील तेलबियाचे क्षेत्र दरवर्षी कमी होत असून, यावर्षीही रब्बी हंगामात करडई ९, जवस १२ तर तीळ २४ टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी करण्यात आली. याचा परिणाम तेल दरवाढीवर होण्याची शक्यता आहे.राज्याचा विचार केल्यास यावर्षी आतापर्यंत कोकण विभागात तीळ सरासरी ३०० हेक्टरपैकी २३८ हेक्टर म्हणजेच ७९ टक्के तिळाची पेरणी करण्यात आली आहे. नाशिक विभागात तीनही पिके शून्य टक्के, पुणे विभागात करडई ३,११७ पैकी ५२० हेक्टर म्हणजेच १७ टक्केच पेरणी झाली आहे. जवस सरासरी २८९ पैकी ३७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. ही टक्केवारी १३ आहे, तर तीळ शून्य टक्के आहे. कोल्हापूर विभागात करडई क्षेत्र सरासरी २,३५२ हेक्टर आहे. पैकी ३२६ हेक्टर म्हणजेच १४ टक्के पेरणी झाली आहे. जवस व तीळ शून्य टक्के आहे. औरंगाबाद विभागात करडईचे रब्बीतील सरासरी क्षेत्र ४,२१४ हेक्टर आहे. पैकी सहा हेक्टरवरच यावर्षी रब्बी हंगामात करडईची पेरणी करण्यात आली. जवस व तीळ तर शून्य टक्केच आहे. लातूर विभागातील स्थिती बघितल्यास करडईचे रब्बी हंगामातील क्षेत्र सरासरी ७६,३१८ हेक्टर आहे. पैकी आतापर्यंत ६,६९० हेक्टरवर म्हणजेच ९ टक्के करडईची पेरणी करण्यात आली. याच विभागात जवस पीक घेतले जाते. हे क्षेत्र सरासरी ४,५३४ हेक्टर आहे; पण यावर्षी ४४८ हेक्टरवर म्हणजेच १० टक्केच पेरणी झाली आहे. तिळाची ३९४ पैकी २४ टक्के म्हणजेच ६ टक्के एवढीच पेरणी करण्यात आली आहे.विदर्भात करडी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. तथापि, या विभागातही हे क्षेत्र वेगाने कमी झाले असून, या रब्बी हंगामात आतापर्यंत अमरावती विभागात सरासरी १,२३१ पैकी केवळ ६९ हेक्टर म्हणजेच ६ टक्केच पेरणी झाली असून, जवस शून्य टक्के तर तीळ ११८ पैकी २४ हेक्टर म्हणजेच २० टक्के पेरा आटोपला आहे. नागपूर विभागाची स्थिती वेगळी नाही. या विभागात करडई शून्य टक्के, जवस सरासरी १३,१९५ पैकी १,८२७ हेक्टर म्हणजेच १४ टक्के पेरणी झाली आहे. तीळ १८० पैकी ४५ हेक्टर म्हणजेच १४ टक्के एवढीच पेरणी झाली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती