शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

यावर्षीही रब्बीत तेलबिया क्षेत्र घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 14:36 IST

अकोला: राज्यातील तेलबियाचे क्षेत्र दरवर्षी कमी होत असून, यावर्षीही रब्बी हंगामात करडई ९, जवस १२ तर तीळ २४ टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी करण्यात आली. याचा परिणाम तेल दरवाढीवर होण्याची शक्यता आहे.

अकोला: राज्यातील तेलबियाचे क्षेत्र दरवर्षी कमी होत असून, यावर्षीही रब्बी हंगामात करडई ९, जवस १२ तर तीळ २४ टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी करण्यात आली. याचा परिणाम तेल दरवाढीवर होण्याची शक्यता आहे.राज्याचा विचार केल्यास यावर्षी आतापर्यंत कोकण विभागात तीळ सरासरी ३०० हेक्टरपैकी २३८ हेक्टर म्हणजेच ७९ टक्के तिळाची पेरणी करण्यात आली आहे. नाशिक विभागात तीनही पिके शून्य टक्के, पुणे विभागात करडई ३,११७ पैकी ५२० हेक्टर म्हणजेच १७ टक्केच पेरणी झाली आहे. जवस सरासरी २८९ पैकी ३७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. ही टक्केवारी १३ आहे, तर तीळ शून्य टक्के आहे. कोल्हापूर विभागात करडई क्षेत्र सरासरी २,३५२ हेक्टर आहे. पैकी ३२६ हेक्टर म्हणजेच १४ टक्के पेरणी झाली आहे. जवस व तीळ शून्य टक्के आहे. औरंगाबाद विभागात करडईचे रब्बीतील सरासरी क्षेत्र ४,२१४ हेक्टर आहे. पैकी सहा हेक्टरवरच यावर्षी रब्बी हंगामात करडईची पेरणी करण्यात आली. जवस व तीळ तर शून्य टक्केच आहे. लातूर विभागातील स्थिती बघितल्यास करडईचे रब्बी हंगामातील क्षेत्र सरासरी ७६,३१८ हेक्टर आहे. पैकी आतापर्यंत ६,६९० हेक्टरवर म्हणजेच ९ टक्के करडईची पेरणी करण्यात आली. याच विभागात जवस पीक घेतले जाते. हे क्षेत्र सरासरी ४,५३४ हेक्टर आहे; पण यावर्षी ४४८ हेक्टरवर म्हणजेच १० टक्केच पेरणी झाली आहे. तिळाची ३९४ पैकी २४ टक्के म्हणजेच ६ टक्के एवढीच पेरणी करण्यात आली आहे.विदर्भात करडी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. तथापि, या विभागातही हे क्षेत्र वेगाने कमी झाले असून, या रब्बी हंगामात आतापर्यंत अमरावती विभागात सरासरी १,२३१ पैकी केवळ ६९ हेक्टर म्हणजेच ६ टक्केच पेरणी झाली असून, जवस शून्य टक्के तर तीळ ११८ पैकी २४ हेक्टर म्हणजेच २० टक्के पेरा आटोपला आहे. नागपूर विभागाची स्थिती वेगळी नाही. या विभागात करडई शून्य टक्के, जवस सरासरी १३,१९५ पैकी १,८२७ हेक्टर म्हणजेच १४ टक्के पेरणी झाली आहे. तीळ १८० पैकी ४५ हेक्टर म्हणजेच १४ टक्के एवढीच पेरणी झाली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती