शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

यावर्षीही रब्बीत तेलबिया क्षेत्र घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 14:36 IST

अकोला: राज्यातील तेलबियाचे क्षेत्र दरवर्षी कमी होत असून, यावर्षीही रब्बी हंगामात करडई ९, जवस १२ तर तीळ २४ टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी करण्यात आली. याचा परिणाम तेल दरवाढीवर होण्याची शक्यता आहे.

अकोला: राज्यातील तेलबियाचे क्षेत्र दरवर्षी कमी होत असून, यावर्षीही रब्बी हंगामात करडई ९, जवस १२ तर तीळ २४ टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी करण्यात आली. याचा परिणाम तेल दरवाढीवर होण्याची शक्यता आहे.राज्याचा विचार केल्यास यावर्षी आतापर्यंत कोकण विभागात तीळ सरासरी ३०० हेक्टरपैकी २३८ हेक्टर म्हणजेच ७९ टक्के तिळाची पेरणी करण्यात आली आहे. नाशिक विभागात तीनही पिके शून्य टक्के, पुणे विभागात करडई ३,११७ पैकी ५२० हेक्टर म्हणजेच १७ टक्केच पेरणी झाली आहे. जवस सरासरी २८९ पैकी ३७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. ही टक्केवारी १३ आहे, तर तीळ शून्य टक्के आहे. कोल्हापूर विभागात करडई क्षेत्र सरासरी २,३५२ हेक्टर आहे. पैकी ३२६ हेक्टर म्हणजेच १४ टक्के पेरणी झाली आहे. जवस व तीळ शून्य टक्के आहे. औरंगाबाद विभागात करडईचे रब्बीतील सरासरी क्षेत्र ४,२१४ हेक्टर आहे. पैकी सहा हेक्टरवरच यावर्षी रब्बी हंगामात करडईची पेरणी करण्यात आली. जवस व तीळ तर शून्य टक्केच आहे. लातूर विभागातील स्थिती बघितल्यास करडईचे रब्बी हंगामातील क्षेत्र सरासरी ७६,३१८ हेक्टर आहे. पैकी आतापर्यंत ६,६९० हेक्टरवर म्हणजेच ९ टक्के करडईची पेरणी करण्यात आली. याच विभागात जवस पीक घेतले जाते. हे क्षेत्र सरासरी ४,५३४ हेक्टर आहे; पण यावर्षी ४४८ हेक्टरवर म्हणजेच १० टक्केच पेरणी झाली आहे. तिळाची ३९४ पैकी २४ टक्के म्हणजेच ६ टक्के एवढीच पेरणी करण्यात आली आहे.विदर्भात करडी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. तथापि, या विभागातही हे क्षेत्र वेगाने कमी झाले असून, या रब्बी हंगामात आतापर्यंत अमरावती विभागात सरासरी १,२३१ पैकी केवळ ६९ हेक्टर म्हणजेच ६ टक्केच पेरणी झाली असून, जवस शून्य टक्के तर तीळ ११८ पैकी २४ हेक्टर म्हणजेच २० टक्के पेरा आटोपला आहे. नागपूर विभागाची स्थिती वेगळी नाही. या विभागात करडई शून्य टक्के, जवस सरासरी १३,१९५ पैकी १,८२७ हेक्टर म्हणजेच १४ टक्के पेरणी झाली आहे. तीळ १८० पैकी ४५ हेक्टर म्हणजेच १४ टक्के एवढीच पेरणी झाली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती