शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लाचखोरांची आठ कोटींची मालमत्ता गोठविण्याला कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 10:40 IST

Bribe Case शासनाकडून यावर निर्णय झाला नसल्याने या लाचखोरांची व भ्रष्टाचाराची संपत्ती आजही त्यांच्या ताब्यात आहे.

- सचिन राऊत

अकोला : शासनाच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून, तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या भ्रष्टाचार व लाचखोरांच्या तेरा प्रकरणांमध्ये राज्यातील तब्बल आठ कोटी २८ लाख रुपयांची मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाकडे सादर केला आहे. मात्र, शासनाकडून यावर निर्णय झाला नसल्याने ही मालमत्ता गोठविण्यास कोलदांडा घातल्याची माहिती आहे.

राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून त्यांनी भ्रष्टाचार, तसेच बेहिशेबी मालमत्ता व लाचखोराविरुद्ध कारवाया केल्या आहेत. यामधील तेरा प्रकरणांमध्ये बेहिशेबी मालमत्ता भ्रष्टाचार, तसेच लाचखोरांची सुमारे आठ कोटी २८ लाख ३४ हजार ३९२ रुपयांची मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाकडे सादर केलेला आहे. मात्र, शासनाकडून यावर निर्णय झाला नसल्याने या लाचखोरांची व भ्रष्टाचाराची संपत्ती आजही त्यांच्या ताब्यात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मालमत्ता गोठविण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. यामध्ये सर्वाधिक रक्कम ही नगर विकास विभागाची असून दोन कोटी ९० लाख रुपयांचा आकडा या विभागातील लाचखोरांची संपत्ती गोठविण्याचा आहे. त्याखालोखाल आरोग्य विभागातील दोन कोटी ८३ लाख रुपयांची संपत्ती गोठविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांची एक कोटी ९३ लाख रुपयांची मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव एसीबीने सादर केलेला आहे. मात्र, यावर निर्णय होत नसल्याने ही मालमत्ता गोठविण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे.

 

लाचखोर, भ्रष्टाचाऱ्यामध्ये या विभागाचा समावेश

राज्यात एसीबीने केलेल्या कारवायांमध्ये १३ प्रकरणांत लाचखोर व भ्रष्टाचारी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींची संपत्ती गोठविण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये महसूल विभागातील लाचखोरांची ३० लाख रुपये, वनविभागाचे ११ लाख रुपये, नगर विकास विभागातील लाचखोरांचे २ कोटी ९० लाख रुपये, ग्रामविकास विभागाची सोळा लाख रुपये, राज्य परिवहन विभागाची चार लाख रुपये, आरोग्य विभागातील लाचखोरांची दोन कोटी ८३ लाख रुपये, तर सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर यांची एक कोटी ९३ लाख रुपयांची संपत्ती गोठविण्याचा प्रस्ताव आहे. असा एकूण आठ कोटी २८ लाख रुपयांची संपत्ती गोठविण्यासाठी एसीबीने प्रयत्न चालविले आहेत.

अशी आहेत विभागनिहाय प्रकरणे

मुंबई विभाग दोन प्रकरणे, ठाणे विभाग दोन, पुणे विभाग एक, नाशिक विभाग चार, नागपूर विभाग दोन, अमरावती विभाग दोन, अशी एकूण १३ प्रकरणे मालमत्ता गोठविण्यासाठी शासनाकडे प्रलंबित आहेत, तर औरंगाबाद व नांदेड विभागात संपत्ती गोठविण्याचे एकही प्रकरण नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाBribe Caseलाच प्रकरण