शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

शालेय पोषण आहाराच्या दर्जाकडे डोळेझाक

By admin | Updated: January 12, 2017 02:20 IST

पोषण आहार अधीक्षक पदाधिका-यांनाही जुमानत नसल्याचा प्रकार जि.प. सभेत समोर आला.

अकोला, दि. ११- जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या मध्यान्ह भोजन योजनेचा आहार अत्यंत निकृष्ट आहे. तांदूळ, मसाले, इतर साहित्याची तपासणी कोणी कधी केली, याच्या अहवाल नोंदवह्या बारा महिन्यांपासून कोर्‍या आहेत. त्यावर कोणतेही शेरे नाहीत, हा प्रकार गंभीर असतानाही त्याची माहिती दडवण्याचा प्रकार जिल्ह्यातील शालेय पोषण आहार अधीक्षकांकडून केला जात आहे. कारणे दाखवा नोटिस बजावलेल्या अकोट, तेल्हारा, बाळापूर येथील अधीक्षकांनी त्याचे उत्तरही न देण्याचा उद्दामपणा केला आहे. त्यातून ते कुणालाच जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्यावर कारवाई न केल्यास अधिकार्‍यांनी ध्यानात ठेवावे, असा इशारा शिक्षण समितीच्या सभेत बुधवारी देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्यांनी विविध मुद्दे मांडले. शालेय पोषण आहाराचा जिल्ह्यात बोजवारा उडालेला आहे ,या संदर्भात लोकमत ने स्टींग ऑपरेशनकरून जिल्हाभरातील विदारक चित्र समोर मांडले होते. त्यांचे पडसाद या बैठकीत उमटले, कंत्राटदाराकडून हळद पावडर- २0,५00, मिरची पावडर- १९,३00, गरम मसाला- १९,३00, मोहरी- ७,४00, वाटाणा- ६,३९0, तूर डाळ- १५,४00 प्रतिक्विंटल दराने पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात बाजारभावाच्या दोनशे टक्केपेक्षाही अधिक ते दर असले तरी या वस्तूंचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. पुरवठा होणारी तूर डाळ बाजारात सध्या ७0 रुपये प्रतिकिलोची असल्यासारखी आहे. त्यातच कमी वजनाच्या तांदळाचे कट्टे शाळांच्या मुख्याध्यापकाकडून का स्वीकारले जातात, या गंभीर प्रकारांकडे अधिकारी का दुर्लक्ष करतात, या मुद्यांवर सभापती अरबट यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. पोषण आहार नोंदीच्या वह्यांमध्ये भेट देणारांचे शेरेच नाहीत. त्या वह्या वर्षभरापासून कोर्‍याच आहेत. त्यामुळे या गंभीर घोळाला पाठीशी घालणारांची आता गय केली जाणार नाही, असेही अरबट यांनी सुनावले.