शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सिरसो गावची कथाच न्यारी; गावातून झाले सहा जिल्हाधिकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:25 IST

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यातील शहराला लागूनच असलेले किमान दहा हजार लोकसंख्या असलेले सिरसो गाव. आतापर्यंत या गावाने ६ ...

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यातील शहराला लागूनच असलेले किमान दहा हजार लोकसंख्या असलेले सिरसो गाव. आतापर्यंत या गावाने ६ जिल्हाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणारे नागरिक घडविले. आतापर्यंत एवढे जिल्हाधिकारी होणारे एकही गाव या विभागात सापडणे अवघडच आहे. एवढेच नव्हे तर सद्यस्थितीत विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून अनेक जण कर्तव्य बजावत आहेत.

मूर्तिजापूरपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात प्राथमिक शिक्षणासाठी केवळ सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा, सर्वांनीच शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले. त्यानंतरच्या माध्यमिक शिक्षणासाठी मूर्तिजापूर येथे जावे लागते. शहरातही माध्यमिक शिक्षणासाठी बोटावर मोजण्याइतक्याच शाळा होत्या. सिरसो येथून कितीतरी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सहा किलोमीटर ये-जा करणे, अशी बारा किलोमीटरची पायपीट करावी लागत असे, अशा परिस्थितीतही या गावचे विद्यार्थी घडले. आतापर्यंत या गावाने ६ जिल्हाधिकारी, ४ तहसीलदार, ३ गटविकास अधिकारी दिले, एवढेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय ऊर्फ बाळासाहेब मेहरे हेसुद्धा याच गावचे आहेत. आतापर्यंत या गावातून ७४ अधिकारी झाले असून, सद्यस्थितीत ७८ एवढे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय सेवेत आतापर्यंत २०७ लोकांनी कर्तव्य बजावले आहे. याच धर्तीवर 'सिरसोचे मातब्बर' विजय हरणे संपादित एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आले असून, या पुस्तकात कर्मचारी ते जिल्हाधिकारी व पदाधिकारी यांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.

------------------

हे झाले जिल्हाधिकारी, तहसीलदार

भगवंतराव देशमुख (जिल्हाधिकारी), जयवंतराव देशमुख (जिल्हाधिकारी), राजाभाऊ देशमुख(जिल्हाधिकारी), बलदेवसिंह हरणे (निवासी उपजिल्हाधिकारी), पंजाबराव वानखडे (अप्पर जिल्हाधिकारी), दिनेश वानखडे (अप्पर जिल्हाधिकारी), गणपतराव मेहरे (तहसीलदार), पूजा माटोडे(हरणे)(तहसीलदार), मुकुंदराव अंबाडे (तहसीलदार), देवराव इंगळे(तहसीलदार)

------------------------

‘कलेक्टरचे गाव’ ही वेगळी ओळख

सिरसो या गावात आतापर्यंत वेगवेगळ्या विभागात अनेक अधिकारी घडले आहेत, परंतु एकेकाळी या गावाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत ६ जिल्हाधिकारी या गावाने दिल्याने ‘कलेक्टरचे गाव’ म्हणून या पंचक्रोशीती ओळखले जायचे, ही ओळख आजही कायम आहे.