शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

नापिकीने हिरावले सौभाग्याचे कुंकू!

By admin | Updated: April 17, 2016 01:14 IST

देऊळगावराजा तालुक्यातील चिंचोली बुरकूलची घटना; युवा शेतकर्‍याची आत्महत्या चटका लावणारी.

नीलेश शहाकार / बुलडाणाविलास व ज्योती यांच्या संसार वेलीवर उमललेले पायल नावाचे लहान फूल..या तिघांचा परिवार दीड एकर शेतीवर आपला चरितार्थ चालवत होता.. शेतातील उत्पन्नाला जोड म्हणून ते शे तमजुरीही करायचे आणि संसाराचा गाडा हाकायचे ..पण या संसाराला दृष्ट लागली..दोन दिवसां पूर्वी घराच्या कर्त्याधर्त्या विलासने फासावर लटकवून घेतले..अन् सर्व होत्याचे नव्हते झाले. ज्योतीच्या सौभाग्याचे कुंकू रुसले, तर तीन वर्षाच्या पायलच्या डोक्यावरील पितृछत्र हरविले. हे सर्व नापिकीने केले..देऊळगावराजा तालुक्यातील चिंचोली बुरकूल येथे विलास जगन बुरकूल या २५ वर्षीय युवा शे तकरी परिवराची ही व्यथा. चार वर्षांपूर्वी नजीकच्या खैरव गावातील ज्योती हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. लग्नानंतर विलास आई-वडिलापासून वेगळा राहायला लागला. त्यांना मुलगी झाल्यानंतर वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवत, विलासने आपल्या शेतात आणखी कष्ट करण्यास सुरुवात केली; मात्र त्याच्या कष्टाला निसर्गाने साथ दिली नाही. विलासकडे असणार्‍या चिंचोली शिवारात गट नं.९६ मधील दीड एकर कोरडवाहू शेतात त्याने २0१४ मध्ये सोयाबीनची पेरणी केली; मात्र ऐन हंगामात पावसाने पाठ फिरवली व पीक हातचे गेले. निसर्गाशी दोन हात करीत दुबार पेरणीसाठी विलासने स्टेट बँक ऑफ हैदराबाद देऊळगावराजा शाखेतून कर्ज घेतले; मात्र त्याच्या मागे लागलेली नापिकीची साडेसाती थांबता थांबत नव्हती. २0१५ मध्ये खासगी कर्ज घेत, त्याने शेतात कपाशी पेरली. कपाशी बोंडावर आली यावेळी अवकाळी पावसामुळे सारे पीक जमीनदोस्त केले. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा अशा वैफल्यग्रस्त परिस्थितीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी उभी केलेली शेतीची लढाई हा युवा शेतकरी हरला होता. पत्नी ज्योती व चिमुकली पायल या दोन जिवांचा विचार न करता, विलासने मृत्यूला जवळ केले. यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.