शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आदर्श अंगणवाड्यांची संख्या दोन वर्षात घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:11 IST

प्रत्येक जिल्ह्यात आधी १४४ अंगणवाडी केंद्रांची संख्या निश्चित असताना आता ८५ ते ८७ केंद्रच आदर्श केले जाणार आहेत.

अकोला: राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श केंद्रात रूपांतरण करण्यासाठी शासनाने २०१७-१८ मध्ये ठरवलेला ५ हजार केंद्रांचा लक्ष्यांक निधीची तरतूद करताना ३,०३२ वर आणण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आधी १४४ अंगणवाडी केंद्रांची संख्या निश्चित असताना आता ८५ ते ८७ केंद्रच आदर्श केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी १ लाख ६५ हजार रुपये खर्च करण्याला मंजुरी देण्यात आली आहे.राज्यात अंगणवाडी ९७,२६० तर मिनी अंगणवाड्यांची संख्या ११,०८४ मिळून १ लाख ८,३४४ केंद्रे आहेत. शासनाच्या सर्व्हेनुसार त्यापैकी केवळ १४,१३२ केंद्रांमध्ये वीजपुरवठा आहे. ९४,११२ केंद्रात साधा वीजपुरवठाही नाही. बालक व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक बाल विकास व सेवा योजना राज्याच्या महिला व बालकल्याण विकास विभागाकडून राबवली जाते. अंगणवाडीतील ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचा भौतिक, शारीरिक आणि सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये पोषणयुक्त आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, औपचारिक शालेय शिक्षणाचा समावेश आहे. ही कामे गतीने करण्यासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने ३० मार्च २०१७ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अंगणवाडी केंद्र आदर्श करण्याच्या योजनेला मंजुरी दिली. तसा शासन निर्णय ११ एप्रिल २०१७ रोजी प्रसिद्धही झाला. त्यामध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात राज्यातील ५ हजार अंगणवाडी केंद्रे आदर्श केली जातील, असे नमूद केले. त्यानंतर मात्र, या निर्णयावर पडदा पडला. २०१७-१८, २०१८-१९ या दोन वर्षात अंगणवाडी केंद्र आदर्श करण्यासाठी काहीच उपाययोजना झाली नाही. आता शासनाने जाता-जाता या निर्णयाची आठवण म्हणून आधी ठरवलेला ५ हजार केंद्रांचा लक्ष्यांक कमी केला. आधीची ८० कोटी रुपयांची तरतूदही ५० कोटींवर आणण्यात आली. त्यातून आता ३,०३२ अंगणवाडी केंद्रे आदर्श केली जातील. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुरवठादारही निश्चित करण्यात आला. या प्रकाराने राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र