शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘नरेगा ‘ लाभार्थ्यांच्या अडचणींचा घेतला जाणार शोध; अकोला जिल्ह्यात तालुका स्तरावर मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 18:53 IST

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अडचणींचा शोध घेऊन, उपाययोजना करण्यासाठी अकोला जिल्ह्यात तालुका स्तरावर लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येतात.लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि अडचणींवर तातडीने उपाययोजना करून रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर संबंधित पंचायत समितींमध्ये लाभार्थ्यांचे मेळावे येणार आहेत.

- संतोष येलकर

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अडचणींचा शोध घेऊन, उपाययोजना करण्यासाठी अकोला जिल्ह्यात तालुका स्तरावर लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत राबविण्यात येणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने सिंचन विहिरी, फळबाग लागवड, विहिरींचे पुनर्भरण व इतर कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अनेक प्रकारच्या अडचणी आणि तक्रारी असतात. त्यानुषंगाने ‘नरेगा’ अंतर्गत लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि अडचणींवर तातडीने उपाययोजना करून रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर संबंधित पंचायत समितींमध्ये लाभार्थ्यांचे मेळावे घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत ९ मार्चपासून राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुका स्तरावर घेण्यात येणाºया नरेगा लाभार्थ्यांच्या मेळाव्यात नरेगा उपजिल्हाधिकाºयांसह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असून, मेळाव्यांमध्ये लाभार्थ्याच्या अडचणींचा शोध घेण्यात येणार आहे., तसेच अडचणी लक्षात घेऊन कामे मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.तलाठ्यांकडून लाभार्थ्यांना नोटीस !‘नरेगा’ अंतर्गत लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मेळाव्याला लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याबाबत जिल्ह्यातील नरेगा अंतर्गत लाभार्थ्यांना तलाठ्यांकडून नोटीस देण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी (नरेगा ) अशोक अमानकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले.नरेगा अंतर्गत कामांसंदर्भात लाभार्थ्यांच्या अडचणी, संबंधित यंत्रणांसंदर्भात तक्रारी जाणून घेणे आणि कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर लाभार्थ्याचे मेळावे घेण्यात येणार आहेत.-अशोक अमानकर, उपजिल्हाधिकारी (नरेगा),अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना