शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘एनआरसी’ केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी घातक -  प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:35 IST

हा कायदा सर्वांच्या विरोधात आहे. विशेषत: भटक्या व बहुजन वर्गासाठी हा कायदा घातक ठरू शकतो, असा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एनआरसी कायद्याला मुस्लीम समाजाचा मोठा विरोध सुरू आहे. त्यामुळे हा कायद्या मुस्लीमविरोधी आहे, असा देखावा निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात हा कायदा सर्वांच्या विरोधात आहे. विशेषत: भटक्या व बहुजन वर्गासाठी हा कायदा घातक ठरू शकतो, असा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अ‍ॅड.आंबेडकर यांनी शुक्रवारी कुटासा, सावरा, मुंडगाव, हिवरखेड, आडसुळ फाटा, निंबा फाटा, पारस, सस्ती आदी ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर परखड भाष्य केले. ते म्हणाले की, देशातील सत्ताधारी सध्या मनमानी पद्धतीने कायदे तयार करत आहेत. लोकांचा विरोध ते बेदखल करत आहेत. या सत्ताधाऱ्यांना चाप बसायलाच हवा. देशाच्या तिजोरीत देश चालविण्यासाठी आवश्यक असलेला पैसासुद्धा नाही.त्यामुळे ते विविध फंडे वापरत असून, सर्वसामान्यांना वेठीस धरून सर्व विकायला काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने बोलताना त्यांनी शासनाच्या धोरणावर ताशेरे ओढले. शासन केवळ पर्यावरण बिघडल्याचे सांगते; परंतु त्यावरील उपाययोजना करीत नाही. अकोला जिल्ह्यातील पर्वतांच्या रांगेत मी शासनाला बी पेरणीची परवानगी मागितली; पण दिली नाही, असा आरोप त्यांनी केला. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करणारी एकमेव जि. प. ही अकोला आहे. त्यामुळे विकासाचे नियोजन करायचे असेल तर सरकारने जि. प. ला विकास निधी थेट द्यावा म्हणजे विविध योजना प्रभावीपणे राबविता येतील, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीAkolaअकोला