शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

आता जि.प. निवडणुकीची आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 11:48 IST

आरक्षित जागांच्या संदर्भात २० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीनंतर निवडणुकीचा पुढील कार्यक्रम ठरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : चालू वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पार पडल्यानंतर आता काही दिवसांतच जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेच्या गट, गणांचे आरक्षण तसेच अंतिम मतदार यादीला सोमवारी प्रसिद्धी देण्यात आली. आता नागरिकांच्या मागास प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावयाच्या आरक्षित जागांच्या संदर्भात २० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीनंतर निवडणुकीचा पुढील कार्यक्रम ठरणार आहे.राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत आरक्षण ठरविण्यासाठी नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गाच्या लोकसंख्येची माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने २८ आॅगस्टनंतर २८ आॅक्टोबर रोजी सादर केले होते.त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत ६ महिन्यांत निवडणूक प्रक्रियाही पूर्ण केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. त्याचवेळी, राज्यपालांचा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा ३१ जुलै रोजीचा अध्यादेश, राज्यघटनेतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीसंदर्भातील आरक्षणाच्या तरतुदीशी विसंगत आहे. त्या अध्यादेशामुळेही जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण आरक्षित जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिकच होणार आहे. त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण देण्यासाठी या प्रवर्गाच्या लोकसंख्येची माहिती शासनाकडून मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. प्रतिज्ञापत्रानुसार शासनाने आयोगाला दोन महिन्यांत माहिती देऊ, तसेच सहा महिन्यांत निवडणूक घेऊ, असेही स्पष्ट केले.

लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणप्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) मिळून नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या जागा निश्चित होतील. त्यासाठी २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक सर्व्हेची माहिती न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. त्या लोकसंख्येनुसार आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देईल, यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदElectionनिवडणूक