शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

आता जलसंवर्धनच तारणार - अंकुर देसाई

By admin | Updated: March 17, 2016 02:34 IST

जलजागृती सप्ताहाची झाली सुरुवात.

अकोला: पाणी र्मयादित असून, शेतीसह उद्योग व संबंधित व्यवसायात पाण्याचा मागणी वाढली आहे. र्मयादित पाण्याचा यथोचित वापर होणे ही काळाची गरज आहे. यासाठी पाण्याचे संवर्धन करावे लागणार असल्याचे प्रतिपादन पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यांनी बुधवारी केले.१६ ते २२ मार्च दरम्यान राज्यासह जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजीराव दिवेकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील नद्यांमधील जलपूजनाने करण्यात आली. यावेळी पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अकुंर देसाई उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, कृषिभूषण दादाराव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी मिलिंद शेगावकर, माहिती अधिकारी युवराज पाटील, मनोज तायडे यांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती. अंकुर देसाई यांनी माती आणि पाण्याचे पूजन करणे किती गरजेचे आहे, हे सांगताना शासनाने जलसंवर्धनासाठीच राज्यात जलजागृती अभियान सुरू केले असल्याचे सांगितले. या अभियानात शेतकरी, नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.दिवेकर यांनी पाण्याचे जतन, संवर्धन हे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. या बाबीचा प्रसार शाळा-महाविद्यालयांपासून प्रत्येक कार्यालयाने करण्याचे आवाहन त्यांनी केले. भुईभार यांनी पाणी व मातीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, पाण्याचे संकट बघता, मूलस्थानी जलंसधारणाचा कार्यक्रम इमानेइतबारे राबविण्याची गरज असून, झाडे लावणे व ते जगवणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांनी जलसंवर्धन-संधारणाचा आदर्श आपल्याला घालून दिला आहे. त्यांची उजळणी महात्मा फुले यांनी ह्यशेतकर्‍यांचा आसूडह्णमधून केली आहे. म्हणून पूजेच्या नादी न लागता पाण्याचे संधारण व संवर्धनावर लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लोळे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या जलजागृती अभियानाची माहिती प्रास्ताविकातून दिली.