शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
2
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
3
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देताहेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
4
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
5
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
6
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
7
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
8
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
9
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
10
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
11
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
12
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
13
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
14
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
15
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
16
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
17
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
18
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
19
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
20
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी

आता जलसंवर्धनच तारणार - अंकुर देसाई

By admin | Updated: March 17, 2016 02:34 IST

जलजागृती सप्ताहाची झाली सुरुवात.

अकोला: पाणी र्मयादित असून, शेतीसह उद्योग व संबंधित व्यवसायात पाण्याचा मागणी वाढली आहे. र्मयादित पाण्याचा यथोचित वापर होणे ही काळाची गरज आहे. यासाठी पाण्याचे संवर्धन करावे लागणार असल्याचे प्रतिपादन पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यांनी बुधवारी केले.१६ ते २२ मार्च दरम्यान राज्यासह जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजीराव दिवेकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील नद्यांमधील जलपूजनाने करण्यात आली. यावेळी पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अकुंर देसाई उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, कृषिभूषण दादाराव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी मिलिंद शेगावकर, माहिती अधिकारी युवराज पाटील, मनोज तायडे यांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती. अंकुर देसाई यांनी माती आणि पाण्याचे पूजन करणे किती गरजेचे आहे, हे सांगताना शासनाने जलसंवर्धनासाठीच राज्यात जलजागृती अभियान सुरू केले असल्याचे सांगितले. या अभियानात शेतकरी, नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.दिवेकर यांनी पाण्याचे जतन, संवर्धन हे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. या बाबीचा प्रसार शाळा-महाविद्यालयांपासून प्रत्येक कार्यालयाने करण्याचे आवाहन त्यांनी केले. भुईभार यांनी पाणी व मातीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, पाण्याचे संकट बघता, मूलस्थानी जलंसधारणाचा कार्यक्रम इमानेइतबारे राबविण्याची गरज असून, झाडे लावणे व ते जगवणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांनी जलसंवर्धन-संधारणाचा आदर्श आपल्याला घालून दिला आहे. त्यांची उजळणी महात्मा फुले यांनी ह्यशेतकर्‍यांचा आसूडह्णमधून केली आहे. म्हणून पूजेच्या नादी न लागता पाण्याचे संधारण व संवर्धनावर लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लोळे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या जलजागृती अभियानाची माहिती प्रास्ताविकातून दिली.