शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

आता २०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST

अकोला : कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असून, आता प्रशासनाने २०० जणांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करण्यासाठी परवानगी दिली आहे; मात्र यासाठी ...

अकोला : कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असून, आता प्रशासनाने २०० जणांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करण्यासाठी परवानगी दिली आहे; मात्र यासाठी कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटली आहे. दररोज एक किंवा दोनच रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे जवळपास सर्व व्यवहारांना रात्री १० पर्यंत मुभा देण्यात आली आहे. यात ५० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळे करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आता २०० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळे आयोजित करता येणार आहेत. कोरोनामुळे मंगल कार्यालयचालक, बँड पथक, स्वयंपाकी यासह यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता २०० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळे आयोजित करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. यासाठी प्रशासनाने काही निर्बंध घालून दिले असले तरी थोडा का होईना लग्नसोहळ्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. पुढील काळात लग्न तिथी असून, या काळात तरी नुकसान भरून निघेल, अशी आशा व्यावसायिकांना लागली आहे.

लग्नसमारंभासाठी या आहेत अटी

मंगल कार्यालय : बंदिस्त मंगल कार्यालये, हाॅटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के; परंतु, जास्तीतजास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल. कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच व्हिडीओ रेकाॅर्डिंग आवश्यक आहे.

लॉन : खुल्या प्रांगणातील, लाॅनमध्ये हाेणाऱ्या विवाहसोहळ्यास प्रांगण किंवा लाॅन क्षमतेच्या ५० टक्के; परंतु, जास्तीतजास्त २०० व्यक्ती मर्यादेत असतील. तसेच लग्नसोहळा व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्याने लसींचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस होणे आवश्यक आहे.

मंगल कार्यालयचालकांत उदासीनता

निर्बंधांमध्ये आता सूट मिळाली आहे. त्यामुळे मंगल कार्यालयात लग्नासाठी १०० जणांची परवानगी आहे; परंतु बहुतांश लोक पावसाळ्यात लग्न समारंभ करत नाही. त्यामुळे दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- संदीप देशमुख

गत दोन वर्षांपासून लग्नाचा हंगाम कोरोनामुळे हातचा जात आहे. आताही हंगाम नसताना हे निर्बंध शिथिल झाले. याचा क्वचितच फायदा आहे. काही महिने तरी लग्नाच्या ऑर्डर मिळणे कठीण आहे.

- संजय शर्मा

लग्नाच्या तारखा

महाराष्ट्र पंचांगानुसार चातुर्माससहित २४ ऑक्टोबरपर्यंत १४ मुहूर्त आहे. तसेच चातुर्मासनंतर मार्च महिन्यापर्यंत शुद्ध मुहूर्त ३५ आहेत.

कोरोना कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी २०० लोकांना परवानगी दिली आहे. आगामी चार महिन्यांत चातुर्माससहित जवळपास १४ तिथी आहेत.

- पंडित रविकुमार शर्मा

सुरू झाल्याने बँडवालेही जोरात

कोरोनामुळे लग्नसोहळे कमी लोकांत होत होते. त्यामुळे बँडवाल्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. आता लग्नसोहळ्यासाठी २०० जणांना परवानगी दिल्याने रोजगार मिळेल.

- विजय सुताडे

लग्नसोहळ्याच्या ऑर्डर येतील, या अपेक्षेने बँड साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. नादुरुस्त साहित्याची दुरुस्ती केली जात आहे. मात्र आता बँडवाल्यांना मागणी आली तरच रोजगाराचा प्रश्न मिटेल.

- नितीन दळे