शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नेट बँकिंग कळणारा आता साक्षर - प्राचार्य बी.जी. शेखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 21:31 IST

अकोला : यापुढे ज्यांना नेट बँकिंग व्यवहार कळतात ते साक्षर व इतर निरक्षर म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आता प्रत्येकाने हे ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. त्यासोबतच या क्षेत्रात होणार्‍या दुरुपयोगाविषयी सतर्क असले पाहिजे, असे प्रतिपादन अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.जी. शेखर यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देअकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यापुढे ज्यांना नेट बँकिंग व्यवहार कळतात ते साक्षर व इतर निरक्षर म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आता प्रत्येकाने हे ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. त्यासोबतच या क्षेत्रात होणार्‍या दुरुपयोगाविषयी सतर्क असले पाहिजे, असे प्रतिपादन अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.जी. शेखर यांनी मंगळवारी केले.अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने जिल्हय़ात सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. मंगळवार, २३ जानेवारी रोजी श्री शिवाजी महाविद्यालयात या विषयावर माध्यम, विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर होते. प्रमुख अतिथी म्हणून बी. जी. शेखर तसेच अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, एक्सीस बॅंकेचे सहायक उपाध्यक्ष निशिकांत उपाध्ये, श्री  शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. आर. इंगळे, वाहतूक शाखेचे  पोलीस  निरीक्षक  विलास पाटील, सायबर  गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मीरसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. शेखर यांनी सामाजिक माध्यमाचे फायदे  तेवढेच  तोटे उदारणासह विषद केले. या समाज माध्यमाची माहिती सर्वांसाठी खुली असून, पोलिसांकडेदेखील ती उपलब्ध असते, त्यामुळे समाजात वितंडवाद होईल, अशा पोस्ट करणे टाळावे, तसेच या माध्यमातून होणारी फसवणूक कशी जिवावर बेतली जाते, घडलेली सत्य घटनांवर उदाहरणे दिली. आपला पासवर्ड, ओटीपी कदापि कुणाला देऊ नसे, असे आवाहन त्यांनी केले.राकेश कलासागर यांनी तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले, यामुळे जगाच्या सीमारेषा  पुसल्याचे सांगताना, हे तंत्रज्ञान जेवढे फायदेशीर आहे तेवढेच विघातक आहे. त्यामुळे यातून आपल्याला हवे असलेल्या ज्ञानाचाच उपयोग करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने काळजीपूर्वक समाज माध्यमाचा वापर करावा, संगणक, इंटरनेट, मोबाइल  तंत्रज्ञानाचा वापर करू न बँकेचे व्यवहार करताना, प्रत्येकाने काळजी घ्यावी, आपण थोडी जरी चूक केली तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे निनावी येणारे फोन, मेल, आदीबाबत नागरिकांनी सतर्क असले पाहिजे, असे ते म्हणाले. सायबर गुन्ह्यासंदर्भात त्यांनी विविध मुद्दे समजावून सांगितले.

उपाध्ये यांनी विविध प्रकारची फसवणूक कशी केली जाते, याची चित्रफितीद्वारे माहिती दिली. त्यांनी विशिंग, फिशिंग, व्हॉटसअँपद्वारे होणारी आर्थिक फसवणूक आदींची इत्थंभूत  माहिती दिली. विजयकांत सागर यांनी समाज माध्यमाचा वापर चांगल्या कामासाठी  करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासंदर्भात त्यांनी या माध्यमाचा  वापर करू न समाजमन कलुषित करण्याचा घडलेला  प्रकार कथन केला. त्यांनीच त्या प्रकरणाचा तपास केल्याचे सांगितले. पाटील यांनी उत्कृष्ठ संचालक व सायबर गुन्ह्याची विस्तृत माहिती विषद केली. डॉ. इंगळे यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Akola Police Head Quarterअकोला पोलीस मुख्यालयBanking Sectorबँकिंग क्षेत्रcyber crimeसायबर क्राइम